AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री शांत झोप हवी असेल तर झोपताना कधीच करू नका ही एक चूक; शरीरासाठी आहे खूप म्हणजे खूपच घातक

सकाळाच्या चांगल्या सुरुवातीसाठी रात्री चांगली आणि शांत झोप आवश्यक असते. मात्र झोप पूर्ण झाली नाही तर संपूर्ण दिवस आळस शरीरात तसाच राहातो, याची अनेक कारणं आहेत.

रात्री शांत झोप हवी असेल तर झोपताना कधीच करू नका ही एक चूक; शरीरासाठी आहे खूप म्हणजे खूपच घातक
| Updated on: Dec 09, 2024 | 5:15 PM
Share

माणसाच्या आयुष्यात झोपेला खूप महत्त्व आहे. झोप जर व्यवस्थित पूर्ण झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहातो. कामाचा मूड देखील असतो. आपली कार्यक्षमता वाढते. मात्र याउलट जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुमची चिडचिड वाढते,  तुमची कार्यक्षमता कमी होते. कोणत्याही कामात मन लागत नाही, दिवसभर आळस अंगामध्ये राहातो आणि डोळ्यावर झोप असते. अशा स्थितीमध्ये तुम्ही करत असलेल्या कामात चुका होऊ शकतात. त्यामुळे चांगली झोप हीच चागंल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असं मानलं जातं. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल आणि असाच प्रकार तुमच्यासोबत अनेक दिवस होत राहिला तर त्यामुळे तुम्हाला इतर आजार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी काय करता येईल याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. उपाय जाणून घेणार आहोत.

चांगल्या झोपेसाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक गोष्टींचा परिणाम हा आपल्या झोपेवर होत असतो. ज्यामध्ये कामाचं टेन्शन, अयोग्य आहार आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. मात्र या सर्व गोष्टींसोबतच आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम,  लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा झोपायला जातात, त्यापूर्वी कमीत कमी एक ते दीड तास मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही अशा गोष्टींचा वापर करू नका, यामुळे होत काय  की तुम्ही जर झोपेपर्यंत मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर करत असाल तर तुमच्या मेंदूला, डोळ्यांना त्यांच्या रेटायनाला रात्र झाली तरी हा सदेंश पोहोचतच नाही, त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे प्रकाशामुळे दिवस असल्याचा संदेश जातो, हा चुकीचा संदेश आहे.

त्यामुळे काय होतं की तुमच्या मेंदूमधून मेलोटॉलीन नावाचा स्त्राव सतत स्त्रावत असतो. तो चांगल्या झोपेसाठी अत्यंत आवश्यक असतो. मात्र मेंदूला योग्य तो संदेश न पोहोचल्यामुळे या स्त्रावाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुम्ही जरी झोपलात तरी तुमची झोप पूर्ण होऊ शकत नाही. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला परत झोपावं वाटतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.