AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीर्य वाया घालवणे पडू शकते भारी ! पिता होण्यासाठी ‘शुक्राणूं’ ची गुणवत्ताच आवश्यक; संशोधनातील माहिती

अलीकडेच, भारत आणि जर्मनीच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता खूप कमी होते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दोन संबधामधील अंतर पुरुषांच्या वंधत्व क्षमतेवर परिणाम करते.

वीर्य वाया घालवणे पडू शकते भारी ! पिता होण्यासाठी ‘शुक्राणूं’ ची गुणवत्ताच आवश्यक; संशोधनातील माहिती
Sperm cellImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2022 | 4:42 PM
Share

प्रत्येक पुरुषाला एका ठरावीक वयानंतर कुटुंब आणि मुलं असावीत अशी इच्छा असते. पण कधी-कधी काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेक वेळा पुरुषांना अपत्य होण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काळाच्या ओघात पुरुषांमध्ये मूल न होण्याची ही समस्या अधिकच वाढत आहे. हे लक्षात घेऊन भारत आणि जर्मनीतील प्रजनन तज्ज्ञांच्या पथकाने (A team of breeding experts) शुक्राणूंची गुणवत्ता आणि इजैक्‍युलेशन(स्खलन) यांच्यातील संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी वीर्यस्खलनाची लांबी (The length of ejaculation)आणि त्याचा शुक्राणूंवर होणारा परिणाम (Effect on sperm) यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ एंड्रोलॉजी आणि युरोपियन अकॅडमी ऑफ एंड्रोलॉजीचे अधिकृत जर्नल अँड्रॉलॉजीमध्ये 1 जुलै रोजी या अभ्यासाची नोंद करण्यात आली आहे.

2 ते 3 दिवसांचे अंतर ठेवा

असे मानले जाते की, दीर्घकाळ (इजैक्‍युलेशन)स्खलन होण्यापासून दूर राहिल्याने वीर्यामधील शुक्राणू पेशींची संख्या वाढते, परंतु प्रजनन तज्ञांनी गर्भधारणेसाठी प्रयत्नशील लोकांना दोन संबधां दरम्यान 2 ते 3 दिवसांचे आदर्श अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संभोगाच्या दरम्यान खूप कमी अंतर ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते.

गर्भधारणेसाठी प्रयत्नशील असाल तर

या अभ्यासासाठी, दोन वीर्यस्खलन आणि 10,000 पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेतील अंतराचे मूल्यांकन करण्यात आले. त्याच्या परिणामात असे आढळून आले की, जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर शुक्राणूंच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, सरासरी गुणवत्तेचे शुक्राणू असलेल्या पुरुषांनी दोन स्खलन दरम्यान दोन दिवसांचे अंतर ठेवावे. दुसरीकडे, ज्या लोकांच्या शुक्राणूंची गुणवत्ता खूपच खराब आहे, त्यांनी ती सुधारण्यासाठी दोन स्खलन दरम्यान 6 ते 15 दिवसांचे अंतर ठेवावे.

50 टक्के वंधत्वाचे कारण पुरुष

कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्लिनिकल भ्रूणविज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. सतीश अडिगा यांनी सेंटर ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड एंड्रोलॉजी, म्युएन्स्टर, जर्मनी यांच्या सहकार्याने मणिपालमधील या अभ्यासादरम्यान टीमचे नेतृत्व केले. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (डॉ.) वेंकटेश म्हणाले, “वंध्यत्व ही महिलांची समस्या म्हणून पाहिली जाते. परंतु भारतात असे आढळून आले आहे की, जवळजवळ 50 टक्के वंध्यत्वाचे कारण पुरुष घटक आहे.” बहुतेक प्रकरणांमध्ये हे, शुक्राणूंच्या खराब गुणवत्तेमुळे होते. व्यंकटेश पुढे म्हणाले की आमचा नवीन अभ्यास अशा लोकांना मदत करेल जे वारंवार अपत्यप्राप्तीमध्ये अपयशी ठरतात.

हे आहेत संशोधनाचे निष्कर्ष

या संशोधनावर भाष्य करताना, डॉ. शरथ राव (डीन, केएमसी मणिपाल) म्हणाले की, पुरुषांमधील जननक्षमतेच्या समस्येवर अजूनही उघडपणे बोलले जात नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हेच कारण आहे की बऱ्याच वेळा ते शोधले जात नाही किंवा उपचार होत नाहीत. ते म्हणाले की, या संशोधनातून जे निष्कर्ष समोर आले आहेत, त्यातून पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येला कसे सामोरे जावे, हे कळेल.

अभ्यासाविषयी डॉ. अडिगा म्हणाले, “आमच्या निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, वीर्यस्खलनातील अंतर हे शुक्राणूंची प्रजनन क्षमता ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यशस्वी गर्भधारणेसाठी वीर्यमधील शुक्राणूंची संख्या पुरेशी नसते. याचे कारण म्हणजे एकदाच वीर्य योनीमध्ये प्रवेश केल्यावर शुक्राणूंना अंड्याकडे पोहावे लागते. म्हणूनच गर्भधारणेसाठी शुक्राणूंची गतिशीलता, रचना आणि डीएनए गुणवत्तेसाठी आवश्यक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.