AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरव्यागार दऱ्या अन् थंड वारा, जुलै महिन्यात भेट देण्यासाठी ‘हे’ हिल स्टेशन आहे बेस्ट

पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात मनमोहक दृश्य तसेच हिरव्यागार दऱ्या आणि धुक्याने झाकलेल्या पर्वतांवर जायचं असेल तर ताामिळनाडू राज्यातील या हिल स्टेशनला एकदा भेट द्या.

हिरव्यागार दऱ्या अन् थंड वारा, जुलै महिन्यात भेट देण्यासाठी 'हे' हिल स्टेशन आहे बेस्ट
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 2:27 PM
Share

तुम्हाला जर रोजच्या धावपळीतून कुठेतरी शांत व कमी गर्दीच्या ठिकाणी जिथे फक्त शांतता, हिरवळ आणि थंड वारा तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करत राहील असे ठिकाण शोधायचे असेल तर तामिळनाडू राज्यात लपलेले रत्न कोटागिरी स्टेशन तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण असू शकते. जुलैमध्ये येथील हवामान खूप आल्हाददायक असते. जर तुम्हाला पावसाळ्यात डोंगर भागामध्ये फिरायला जायचे असेल व तेथील निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर कोटागिरी हा एक उत्तम पर्याय आहे.

निलगिरी पर्वतरांगांच्या तिसऱ्या सर्वोच्च शिखरावर असलेले कोटागिरी हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1800 मीटर उंचीवर वसलेले आहे. येथून तुम्हाला दऱ्याखोऱ्यांचे विहंग दृश्य पहायला मिळेल जे इतर कोणत्याही हिल स्टेशनमध्ये क्वचितच बघायला मिळते. तर या हिल स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे ते उटी आणि कुन्नूर सारख्या प्रसिद्ध हिल स्टेशनपासून थोडे दूर आहे, ज्यामुळे येथे गर्दी तुलनेने कमी असते आणि तुम्हाला अतिशय शांत, प्रदूषणमुक्त वातावरणात निसर्गाचे खरे सौंदर्य पाहायला मिळते.

जुलैमध्ये जेव्हा पावसाचे हलक्या सरी डोंगर भागांवर पडतात, तेव्हा कोटागिरीच्या दऱ्या अधिक हिरव्या आणि फ्रेश दिसतात. या ऋतूत येथील चहाचे मळे, उंच देवदाराची झाडे, धुक्यानी वेढलेले पर्वत आणि विस्तीर्ण जंगले हे अधिकच जादुई दिसतात. पावसाळ्यात येथील धबधबे पूर्ण वेगाने वाहतात आणि हेच सौंदर्य पाहून तुमचे मन मंत्रमुग्ध होते.

तर या हिल स्टेशनवरील कॅथरीन फॉल्स 250 फूट उंचीवरून पडतो आणि आजूबाजूचा दृश्य इतका अद्भुत आहे की तुम्ही लगेच तुमच्या कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहणार नाही. तर हा धबधबा एक शांत वातावरणात वसलेला आहे आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. कोटागिरीमध्ये अनेक सुंदर ट्रेल्स आहेत जिथे तुम्ही ट्रेकिंग किंवा लांब चालण्याचा आनंद घेऊ शकता. विशेषतः कोटागिरी ते रंगास्वामी शिखरापर्यंतचा ट्रेक ॲडव्हेंचरने भरलेला आहे. येथून तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय पाहू शकता.

नीलगिरी टेकड्यांवर असलेल्या चहाच्या बागांना भेट दिल्याने एक वेगळीच शांतता मिळते. तुम्ही येथील ताज्या चहाचा आस्वाद घेऊ शकता आणि चहा उत्पादनाची प्रक्रिया जवळून पाहू शकता. जर तुम्हीही अशा प्रवाशांपैकी एक असाल जे शांत आणि कमी गर्दीची ठिकाणे शोधत असतील, तर कोटागिरी तुमच्यासाठी योग्य ठरेल.

येथे पोहोचायचे कसे?

जर तुम्हाला येथे ट्रेनने जायचे असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मेट्टुपलयम आहे, जे कोटागिरीपासून सुमारे 33 किमी अंतरावर आहे. येथून कोटागिरीला टॅक्सी किंवा लोकल बसने जाता येते. सर्वात जवळचे विमानतळ कोइम्बतूर आहे, जे सुमारे 70 किमी अंतरावर आहे. तसेच स्वत: गाडीने प्रवास करत असाल तर तामिळनाडू व कर्नाटक ते कोटागिरी पर्यंत चांगली जाता येते. उटी आणि कुन्नूर येथून थेट बसेस कोटागिरी पर्यंत जातात जेथून तुम्ही प्रवास करू शकतात.

छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?.
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?.
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार.
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर....
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर.....