मोठी बातमी! नागपूरमध्ये पिकनिकला गेलेल्या 3 जणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू
नागपूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिकनिकला गेलेल्या 3 जणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नागपूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या महादेव घाट इथे पिकनिकला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कन्हान नदीमध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. कामठी कँटोन्मेंट परिसरात असलेल्या महादेव घाट येथे ही घटना घडली आहे. कामठी आणि नागपूर येथील १२ ते १३ जण पिकनिकसाठी महादेव घाटावर गेले होते. पिकनिक सुरू असताना पोहोण्यासाठी हे तिघे पाण्यात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तिघे बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश आलं नाही. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यातील महादेव घाट इथे ही घटना घडली आहे. नागपूर आणि कामठी येथील १२ ते १३ जण पिकनिकसाठी महादेव घाट इथे आले होते. परंतु सध्या बाहेर प्रचंड गर्मी आहे, त्यामुळे या तिघांना पाण्यात पोहोण्याचा मोह आवरला नाही, आणि ते पोहोण्यासाठी कन्हान नदीमध्ये उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पिकनिकचा आनंद घेत असतानाच ही घटना घडली आहे. तिघे जण पोहण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. दरम्यान ही घटना लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा वाचवण्यात यश आलं नाही. रोहित नागदेवे (३३) , गौतम अंबादे (३१) आणि चैतन्य अंबादे (6 ) वर्ष अशी या घटनेमधील मृतांची नावं आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, बचाव पथकाने या तिघांचे मृतदेह नदीबाहेर काढले आहेत, त्यानंतर शवविच्छेदनासाठी हे मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.