मुंबई, ठाणे विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले.. ब्रँड…

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिवसेनेच्या कामगिरीबद्दल आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.त्यांनी मुंबई आणि ठाणे, कल्याण- डोंबिवलीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानताच महत्वाचे विधान केले आहे.

मुंबई, ठाणे विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले.. ब्रँड...
Eknath shinde
| Updated on: Jan 16, 2026 | 9:04 PM

मुंबई महानगर पालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीने बहुमताची मॅजिक फिगर गाठली आहे.त्यामुळे गेल्या २५ वर्षानंतर मुंबई महानगर पालिकेवर भाजपाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मुंबईत भाजपाला ८८ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक मुंबई महानगर पालिकेत महायुती सत्ता येण्याची स्थापन होणार आहे.यावर मोठ्या विजयावर शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, मी मुबईकरांना आणि ठाणेकरांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देतो. आम्ही मुंबई महानगर पालिकेत मॅजिक फिगर बहुमताजवळ पोहचलो आहे. आमच्या मजोरिटीमुळे महापालिकेत महायुतीचा महापौर होईल. ठाणे, कल्याण, डोंबिवली, एमएमआरमध्ये महायुतीने मुसंडी मारली आहे.मुंबईत भाजपा आणि शिवसेना मिळून महापौर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले की विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे. काही लोकांनी भावनेच्या टच देण्याचा प्रयत्न केला. परंतू आम्ही गेल्या साडेतीन वर्षात केलेली कामे, रखडवलेली मेट्रो सुरु केली, स्टे दिलेला कारशेडचे कामे केली, २५ वर्षे सत्ता राबविली त्यांना जनतेने विरोध केला आहे. मुंबईकरांनी विकास कामाला कौल दिला आहे. आमचा विजय हा परफॉर्मन्स बेस आहे असेही त्यांनी सांगितले.

विकास हाच ब्रँड, डेव्हलपमेंट हाच ब्रँड

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘उबाठा १६० जागा लढवून ६० जागांवर आघाडीवर आहेत. परंतू विकास हाच ब्रँड, डेव्हलपमेंट हाच ब्रँड हे लोकांनी सिद्ध केले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगभरातले लोक येथे येतात. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर झाले पाहिजे… जागतिक दर्जाचे शहर झाले पाहिजे. मुंबई ही जगाला हेवा वाटेल अशी व्हायला हवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ट्रीलिटन डॉलर इकॉनॉमी गोल आहे, त्यात मुंबईचा महत्वाचा रोल आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई खड्डेमुक्त करणार

जनतेला मुंबई आम्ही खड्डेमुक्त, प्रदुषण मुक्त, ट्रॅफीक मुक्त, भ्रष्टाचार मुक्त पाहिजे. आम्ही सगळे मुंबईचे रस्ते कॉक्रीटचे करण्याचे काम सुरु केले होते. मेपर्यंत बहुतांश काम पूर्ण होईल, एसटीपी प्लान आखल्याने समुद्रात सांडपाणी थेट जाणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना अपग्रेड करणार आहोत, मेट्रो – २, मेट्रो-३, बीकेसीत अंडरग्राऊंड रोड, वांद्रे वर्सोवा रोड तयार करत आहोत. फ्रीवे ठाणे साकेत गायमुख मार्गे फोर्टमध्ये जाणारा फ्रीवे बांधत आहोत असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Follow Us