
Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ – उतार पाहायला मिळत आहेत. राज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकस्मित निधन झालं आणि राज्याच्या राजकारणावर मोठं संकट आलं. सांगायचं झालं तर, बारामती येथे सभेसाठी जात असताना अजित दादा यांच्या विमानाचं लँडिंग होण्यापूर्वीच स्फोट झाला. अशा परिस्थितीत प्रश्नोत्तरांच्या राजकारणानंतर आता आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही सुरू होताना दिसत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वात आधी मिटकरी यांनी अपघातावर चिंता व्यक्त केली आणि त्यानंतर सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली… मिटकरी म्हणाले, ‘महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते अजित दादा आता आपल्यात नाहीत. अलिकडेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि ते प्रचारासाठी बारामतीला येत होते.”
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे अमोर मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. अजितदादांच्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणी अचानक मार्ग बदलला. पायलटलाही अचानक बदलण्यात आले. मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला की, कागदाचा एकही तुकडा जळाला नाही, पण मृतदेह जळाले. यामुळे काही प्रश्न निर्माण होतात आणि काही शंका निर्माण होतात.
मिटकरी पुढे म्हणाले, ‘मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे…आणि चौकशी होणार असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.’ एवढंच नाही तर, स्वतः केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुनिश्चित केली जावी.. असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2025 सकाळी 8.30 वाजता अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं… अशी बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. तर पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला… या दुर्दैवी अपघातात कॅप्टन सुमित कपूर, को-कॅप्टन शंभवी पाठक, सुरक्षा अधिकारी विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडेंट पिंकी माळी यांचं देखील निधन झालं आहे.