अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात (Dhamangaon Railway Assembly) विकास कामाच्या मुद्यावर भाजप काँग्रेसमध्ये जुंपली आहे. विकासकामाचे भूमिपूजन करण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) धामणगाव मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र काल रात्रीला भूमिपूजनाचे फलक अज्ञातानी तोडले. मात्र, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी हे कटकारस्थान भाजपकडून केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर भाजप आमदार प्रताप अडसड यांनी देखील वीरेंद्र जगतापवर (Virendra Jagtap) निशाणा साधला आहे. गेल्या 15 वर्षात झालेली विकासकामे पालकमंत्री महोदयांनी पहिली आहेत. अशी टीका केली आहे. एकंदरीत धामणगाव विधानसभेत भाजप काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
माजी आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले, मी आमदार असताना या रस्त्यांची कामं मंजूर केली होती. पण, कोरोनामुळं कामं झाली नव्हती. अशावेळी झालेले हे विकासकाम आहेत. आम्हाला न बोलावता विकासकामांचं भूमिपूजन आमदारांनी केलं होते. त्यामुळं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं ठरविलं. रात्री अज्ञात व्यक्तींनी बोर्ड तोडले. पळपूटेपणाचे कृत्य केलं. आमच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचं नाव टाकलं नव्हतं. त्यामुळं आम्ही जशास तसं उत्तर दिलं.
धामणगावचे आमदार प्रताप अडसड म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून काय झालं ते आपण पाहिलं आहे. गाडी हळूहळू चालवावी लागली. रस्ते खराब आहेत. आता फलक प्रोटोकालनुसार लागतील, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे. माजी आमदार भूमिपूजनासाठी हपापले आहे. पदासाठी सत्तालोलूप आहेत. त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. यामुळं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे, असं पोलीस अधीक्षक यांच्याशीही बोलण झाल्याचं अडसड यांनी सांगितलं.