वांगचुक आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, पण… अभिजीत दीपकेंचा गंभीर दाव्याने खळबळ

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके जंतरमंतर आंदोलनानंतर आपल्या स्वगृही परतले आहेत.त्यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली आहे.

वांगचुक आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, पण... अभिजीत दीपकेंचा गंभीर दाव्याने खळबळ
Abhijit Dipke
| Updated on: Aug 01, 2026 | 6:30 PM

कॉक्रोज जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी २० जुलै रौजी जंतरमंतरवर मोर्चा काढला होता. या मोर्च्यावर लाठीमार झाल्यानंतर हे आंदोलन आणखीनच पसरले गेले आणि त्याच्या दबावातून अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीमाना द्यावा लागला. या निदर्शकांच्या भाषेवरुन त्यांना देशभरात आता लक्ष्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंस्टावर पोस्ट करीत ही मुले नादान असून त्यांनी मी माफ करत असल्याचे म्हटले आहे. यानंतर अभिजीत दीपके आता छत्रपती संभाजीनगरात त्यांच्या घरी परतले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता अभिजीत दीपके यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत अभिजीत दीपके यांनी अनेक मुद्यांवर आपले मत मांडले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या मुलाखती निदर्शकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला, त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. या आंदोलनात पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा मारा केला, पॅलेट गनचाही वापर केला. अनेक विद्यार्थ्यांची दृष्टी जाण्याचा धोका आहे. हे सरकार हम इस्तिफे देते नही असे गुर्मीत म्हणायचे आणि अखेर आमच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागला आहे असे एका प्रश्नाला उत्तर देताना दीपके म्हणाले.

वांगचुक आणि मला वेगळं करण्याचे प्रयत्न झाले

अभिजीत दीपके यांनी म्हणाले वांगचुक यांना किडनॅप केलं होतं. मी त्यांना भेटायचा प्रयत्न केला मला भेटू दिलं नाही. त्यांच्या पत्नीचा फोन बाहेर ठेवला जायचा. विरोधी पक्षाचे खासदार तिथे जात नव्हते. वांगचुक यांना किडनॅप केलं होतं. फक्त किडनॅपरच त्यांना भेटू शकत होते. त्यांनी उपोषण सोडावं ही आमची मागणी होती. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो. आता राजीनाम्यावर उपोषण कंटिन्यू ठेवू नका, असं सांगितलं होतं. हे सरकार राजीनामा घेईल याचं वाटत नव्हतं. जंतरमंतरवर त्यांना उपोषण सोडायचं होतं. पण त्यांना किडनॅप केलं. त्यामुळे त्यांना तिथे सोडावं लागलं. वांगचुक यांना आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या हातून त्यांना उपोषण सोडायचं होतं. पण त्यांना किडनॅप केल्याने ते करू शकले नाही. त्यांना आणि मला वेगळं करण्याचे प्रयत्न केले. पण आम्ही वेगळे झालो नाही असेही अभिजीत दीपके यांनी यावेळी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us