औरंगबादः महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या (Aurangabad smart city) वतीने शहराचा हवामान कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात हवामान बदलाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश असेल. बुधवारी या अनुशंगाने वर्ल्ड रिसोर्सेस इस्टिट्यूट (WRI) या संस्थेशी महानगरपालिकेने करार केला. या संस्थेच्या प्रतिनिधींशी महापालिका प्रशासक आणि स्मार्ट सिटीची सीईओ आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी ऑनलाइन पद्धतीने चर्चा केली. त्यानंतर या महाराष्ट्र शासन व चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्या सहकार्याना सदर करार करण्यात आला.
या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय म्हणाले, महानगरपालिकेत आता स्वतंत्र हवामान विभाग उभारला जाणार आहे. या विभागाची जबाबदारी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे राहील. तसेच या विभागाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे.
मनपा प्रशासक आणि WRI संस्थेच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी ऑनलाइन बैठक झाली. यावेळी संस्थेच्या लुबैना रंगवला यांना प्रशासकांनी सांगितले की, ‘अतिवृष्टी, वाढीव तापमान, दुष्काळ, ढगफुटी हे सर्व हवामान बदलाचे दुष्परिणाम आहेत. त्याला आळा घालण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही हवामान कृती आराखडा तयार करू इच्छितो.’
संस्थेशी झालेल्या करारानुसार महापालिकेला 2023 पर्यंत पाच टप्प्यांत 30 वर्षांचा कृती आराखडा तयार करून दिला जाईल. तसेच शहराच्या हवामान कृती आराखड्याचे दोन मुख्य भाग आहेत. प्रदूषण कमी करणे आणि नागरिकांना हवामान बदलासाठी तयार करणे. WRI औरंगाबादला केंद्र शासनाच्या क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्कमध्ये काम करण्यासाठी सहकार्य करेल.
इतर बातम्या-