AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जो व्यक्ती या चार गोष्टींच्या बाबतीत सावधान असतो, तो आयुष्यात यशस्वी होतो

चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टींपासून नेहमी सावध असलं पाहिजे असं ते म्हणतात. जो माणूस या गोष्टींपासून सावध असतो, तो आयुष्यात यशस्वी होतो, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.

Chanakya Niti : जो व्यक्ती या चार गोष्टींच्या बाबतीत सावधान असतो, तो आयुष्यात यशस्वी होतो
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 8:34 PM
Share

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. माणसाचा व्यवहार कोणासोबत कसा असावा? याबाद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाचं आयुष्य हे खाच खळग्यांनी भरलेलं असतं. कधी आयुष्यात दु:ख वाट्याला येतं तर कधी सुख. मात्र परिस्थिती कशीही असो माणसानं संयम ठेवला पाहिजे. ज्याच्याकडे संयम आहे, अशा व्यक्तीचा आयुष्यात कधीही पराभव होत नाही. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यापासून माणसानं कायम सावध राहिलं पाहिजे, जर तुम्ही या गोष्टींपासून सावध राहिलात तर आयुष्यात तुम्ही कधीही पराभवाचं तोंड पहाणार नाहीत, मात्र जर तुम्ही बेसावध राहिलात तर मात्र तुम्ही अडचणीत सापडू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? आणि या चार गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.

पाऊल – चाणक्य म्हणतात माणसानं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वकच टाकलं पाहिजे, नीट पाहून टाकलं पाहिजे. मग तुम्ही रस्त्यावर चालत असाल तरी देखील आणि आयुष्याच्या वाटेवर चालत असाल तरी सुद्धा. तुमचं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वकच पडलं पाहिजे. जर तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि समजा तुमचं रस्त्याकडे लक्ष नाही, तर वाटेत एखादा मोठा खड्डा येऊ शकतो, त्यात तुम्ही पडू शकता, किंवा समोर एखादा मोठा दगड आला तर तुम्हाला ठेच लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमचं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक पडलं पाहिजे. तसचं आयुष्याचं देखील आहे, जर आयुष्यात तुमचं एखादं जरी चुकीचं पाऊल पडलं तर तुमचं संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं, त्यामुळे माणसानं आपलं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

विचार करून बोला – चाणक्य म्हणतात तुमची जीभ ही दुधारी तलवार आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलता तेव्हा आधी त्याच्यासोबत काय बोलायचं आहे? याचा विचार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा आधी बोलून नंतर विचार करण्यापेक्षा आधी विचार करून बोललेलं कधीही उत्तम, त्यामुळे समोरचा माणूस दुखवला जात नाही.

या लोकांपासून सावध रहा – चाणक्य म्हणतात आपण नेहमी धूर्त, स्वार्थी लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो.

पैशांचं नियोजन – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पैशांचं नियोजन हे जमलंच पाहिजे, तुम्ही जर भविष्यासाठी पैशांचं नियोजन केलं तर आयुष्यात यशस्वी व्हाल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.