Baramati: ट्रकने दुचाकीला चिरडले; पती-पत्ती जागीच ठार, चालक फरार!

| Updated on: Nov 18, 2021 | 3:25 PM

अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील लोंढे दाम्पत्य जागीच ठार झाले. या घटनेनंतर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Baramati: ट्रकने दुचाकीला चिरडले; पती-पत्ती जागीच ठार, चालक फरार!
संग्रहित छायाचित्र
Follow us on

बारामतीः ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले असून, अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. काळूराम गणपत लोंढे आणि शाकूबाई काळूराम लोंढे अशी मृतांची नावे आहेत.

बारामतीमध्ये घडलेल्या या अतिशय भीषण अशा घटनेची सविस्तर माहिती अशी की, बारामती – पाटस रस्त्यावरील सोनवडी सुपे फाट्यावर काळूराम गणपती लोंढे हे आपली पत्नी शाकूराम लोंढे यांच्याबरोबर दुचाकीवरून जात होते. साधारणतः सकाळी सव्वाअकराच्या सुमारास एक मालट्रक (क्रमांक एम. एच. 18 बी. जी. 0814 ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने जात होता. याचवेळेस लोंढे हे दुचाकीवरून ( एम. एच 42 बी. सी. 8234) बारामतीच्या दिशेने निघाले होते. मात्र, ऐनवेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्याने दुचाकीवरील लोंढे दाम्पत्याला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील लोंढे दाम्पत्य जागीच ठार झाले. या घटनेनंतर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

भीषण अपघाताची पुनरावृत्ती

इंदापूर तालुक्यात गेल्याच महिन्याच भीषण अपघात झाला होता. त्यात भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि बारामतीच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चिरडून मृत्यू झाला. बारामती-इंदापूर रस्त्यावरील खारा ओढ्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. त्याखाली ट्रॅक्टर चालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इनोव्हा कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्याने आणखी मोठा अनर्थ टळला आहे. इनोव्हा कारमधील प्रवासी जखमी झाले. आज गुरुवारी याच अपघाताची पुनरावृत्ती झाली, अशी चर्चा सुरू होती.

तर वाचला असता जीव

अपघातामध्ये मृत झालेल्या दाम्पत्याने हेल्मेट घातले नसल्याचे समजते. ट्रक चालकाने वेग नियंत्रणात ठेवला असता आणि त्याने मर्यादित वेगात वाहन चालवले असते, तर ते नक्कीच नियंत्रणाबाहेर गेले नसते. त्यामुळे कदाचित हा अपघातही घडला नसता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातल्या या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

इतर बातम्याः

पुण्याच्या विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, जागेची केली पाहणी

Nashik: पोलीस आयुक्तांच्या मोहिमेला पोलिसांचाच हरताळ, हेल्मटसक्तीचा बडगा फक्त सामान्यांवर, नाशिककरांमध्ये तीव्र रोष!

Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!