AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमावादावरून शिंदे गटाच्या मंत्र्याने कर्नाटक सरकारचा घेतला खरपूस समाचार, म्हणाले…

राज्यातील सीमावादावरून राजकारण तापलेले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारवर ईडीच्या कारवाईवरूनही जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

सीमावादावरून शिंदे गटाच्या मंत्र्याने कर्नाटक सरकारचा घेतला खरपूस समाचार, म्हणाले...
| Updated on: Dec 09, 2022 | 3:45 PM
Share

बीडः महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद आता प्रचंड पेटला आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्याने हा वाद पुन्हा आता चिघळला आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटकात मालवाहतून करणाऱ्या वाहनांची झालेली तोडफोडीवरूनही राजकारण तापले आहे.

त्यामुळे आता सीमावादातील समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री गेल्या दोन दिवसापूर्वी खूप काही बोलत होते. मात्र बोमई यांच्या तोडीस तोड आमच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

दोन्ही राज्यातील सीमावादावर समन्वयक मार्गाने केंद्राने पर्याय काढावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले. यावेळी ते म्हणाले की, सीमावादावर आमचे मुख्यमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याकडे समन्वयक मंत्री पदाचा कार्यभार दिला आहे.

त्यामुळे आम्ही कर्नाटक दौऱ्यावर लवकरच जाणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. केंद्र सरकारला भेटीवर आणि कर्नाटक दौरा काढणार आहे.

मात्र आमच्या जाण्यावर कर्नाटक सरकारने व्यत्यय आणला आहे. तरीही आमच्या सरकारतर्फे आम्ही लवकरच सीमा भागात दौरा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

राज्यातील सीमावादावरून राजकारण तापलेले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारवर ईडीच्या कारवाईवरूनही जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना त्याविषयी वारंवार विचारणाही केली जात आहे. त्यामुळे आजही मंत्री शंभूराज देसाई यांनी ईडीच्या कारवाईसंदर्भात कोणी याचिका दाखल केली आहे. त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी कोणी याचिका दाखल केली ते माहीत नसल्याचे सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारवर ईडी आणि सीमावादावरून आता जोरदार टीका होत असली तरी याविषयी तोडगा कधी निघणार असा सवाल महाराष्ट्रातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

त्याच बरोबर सीमाभागाती नागरिकांनही यावर लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशाराही महाराष्ट्र सरकारला देण्यात आला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.