AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी

अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी

| Updated on: Aug 19, 2026 | 6:20 PM
Share

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातील ऐक्यासाठी पुन्हा एकदा साद घातली आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. आठवले म्हणाले की, सर्व रिपब्लिकन गट एकत्र आल्यास पक्षाची ताकद वाढेल आणि कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पूर्वीच्या चुका टाळून आता तरी एकत्रित येण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातील विविध गटांना एकत्र आणण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. अलीकडेच त्यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पक्षात यावं अशी ऑफर दिली होती.  आठवले यांच्या मते, प्रकाश आंबेडकर हे अनुभवी नेते आहेत आणि जर ते रिपब्लिकन पक्षात आले, तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आपल्याला आनंद वाटेल. आठवले यांनी स्पष्ट केले की, मंत्रीपद हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही, तर रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य हेच त्यांचे प्राधान्य आहे.

सर्व नेते एकत्र आल्यास एकाच निळ्या झेंड्याखाली रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढेल आणि कार्यकर्त्यांना चांगल्या संधी मिळतील. 1990 च्या दशकातील काँग्रेससोबतच्या युतीचे उदाहरण देत, त्यावेळी रिपब्लिकन पक्ष एकत्र असता तर 10-12 आमदार निवडून आले असते आणि पक्ष महाराष्ट्रात एक ताकदवर पक्ष म्हणून उभा राहिला असता, असे आठवले यांनी सांगितले. अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Published on: Aug 19, 2026 06:17 PM

Follow Us