AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा; ‘मातोश्री’त बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो”, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. ठाकरेंची ही टीका भाजप नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दांत निशाणा साधला आहे.

जनाची नाही तर मनाची तरी ठेवा; 'मातोश्री'त बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका
| Updated on: Aug 02, 2024 | 3:41 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी अतिशय तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याचा औकात नाही, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे एवढ्यावर थांबले नाहीत. तर उद्धव ठाकरे तुम्ही वाकड्यात शिरला तर तुम्हाला तसंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. तसेच आपले मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला, असा दावा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला. तसेच मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, असा घणाघातही नारायण राणे यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात आणि लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी-जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. नरेंद्र मोदी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी”, अशा शब्दांत नारायण राणेयांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.

‘षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो?’

“उद्धव वाकड्‌यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत, असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो? आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते”, असा दावा नारायण राणे यांनी केला.

“काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वत:चे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजप आणि आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.