मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिले जाणार 3214 कोटी रुपये? फडणवीसांनी फोन घुमवला अन्…भुजबळ यांनी दिली मोठी माहिती!

मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली असे विचारले जात होते. आता खुद्द भुजबळ यांनीच समोर येऊन त्याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिले जाणार 3214 कोटी रुपये? फडणवीसांनी फोन घुमवला अन्...भुजबळ यांनी दिली मोठी माहिती!
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2026 | 3:54 PM

Farmer Help : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सुनिल तटकरे हेदेखील फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. आता राष्ट्रवादीचेच नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी 18 मे रोजीच्या रात्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीचे नेमके कारण काय होते? असे विचारले जात होते. आता खुद्द भुजबळ यांनीच पत्रकार परिषदेत या भेटीमागचे कारण सांगितले आहे. शेतकऱ्यांना चुकारा देण्याबाबत आमच्या भेटीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भुजबळ-फडणवीस भेटीत काय घडलं?

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मका आणि धान (तांदूळ) यांचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत या मागणीसाठी आमदार आमच्या पाठीमागे लागले आहेत. अगोदर आपण शेतकऱ्यांना पैसे द्यायचे त्यानंतर भारत सरकार हे पैसे आपल्याला परत करणार, असे एक धोरण आहे. परंतु आता ईकडे फाईल आणि तिकडे फाईल असे चालू आहे. ही सर्व स्थिती मी फडणवीस यांना सांगितली, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला अन्…

तसेच, निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर फडणवीस यांनी लगेच संबंधितांना फोन केला. हे सगळे पैसे परत सरकारला मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठीची जी फाईल आहे ती शोधा आणि शेतकऱ्यांना तत्काळ पैसे अदा करा, असा आदेशही फडणवीस यांनी दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

3214 कोटी रुपयांचे वाटप होणार

धान आणि मका खरेदीचे एकूण 3214 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. या पैसे देण्याला चुकारा देणे असा शब्द वापरतात, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. दरम्यान, फडणवीस यांनी अधिकाऱ्याला फोन करून याबाबतची कार्यवाही करण्याचा आदेश दिल्याने आता आता धान आणि मका विकूनही चुकारा मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे.

Follow Us