
शेतकऱ्यानी अहोरात्र कष्ट करून पीक जगवण्याचा प्रयत्न केला मात्र आसमानी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून उभा असलेल्या केळी पीक पूर्णतः भूईसपाट झाले आहे.

अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतीला बसला आहे. त्यामध्ये भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सुकवण्यासाठी टाकलेल्या मका अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाल्याची शेतीही भूईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

विक्रीसाठी बाजारसमितीत आणलेला शेतीमालालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आणलेल्या मालाला पावसापासून बचाव व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका फळबागांनादेखील बसला आहे. कष्ट करून केळी लागवड करण्यात आली होती मात्र केळीचेही मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका केळी बागेला बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.