मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी केली घोषणा, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
मनोज जरांगे यांच्या लढ्याला सर्वात मोठे यश आले आहे. सरकारने आता मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सारथी योजनेबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठे काम केले आहे. सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल केले गेले आहे. शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली आहे. परदेशातील शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनानंतर सरकारने ११ तारखेच्या आत कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याचे कबूल केले आहे. आता मराठा विद्यार्थ्यांना सारथी योजनेअंतर्गत परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल झाले आहेत. शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली आहे. परदेशातील शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी, प्रबंध तयार करणे, स्थानिक प्रवासासह इतर खर्चांसाठी दरवर्षी अमेरिका आणि इतर देशांसाठी १५०० अमेरिकन डॉलर (यु.के. वगळून) आणि यु.के.साठी ११०० पौंड इतका निर्वाह भत्ता/मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीसाठी आता क्यूएस रँकिंग विचारात घेतली जाणार आहे. दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांचे विद्यापीठ रँकिंग समान असल्यास, त्यांच्या मागील पदवी परीक्षेतील गुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.