AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका

उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका

| Updated on: Sep 04, 2026 | 8:27 PM
Share

नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत लवकरच निकाल लागेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला. महाराष्ट्रामधील दोन कोटी मतदार वगळले गेले. भविष्यात दोन कोटी घुसले जातील अशी टीका ठाकरेंनी केली. नावाने आता तुम्ही एक जो उल्लेख केला की ही जी काही पॉलिसी आहे, ही योजना आहे, ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या […]

नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत लवकरच निकाल लागेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला. महाराष्ट्रामधील दोन कोटी मतदार वगळले गेले. भविष्यात दोन कोटी घुसले जातील अशी टीका ठाकरेंनी केली. नावाने आता तुम्ही एक जो उल्लेख केला की ही जी काही पॉलिसी आहे, ही योजना आहे, ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावानेच ती रजिस्टर झालेली आहे आणि त्या नावानेच मिळेल. म्हणजे हा काही तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न नाहीये. पण नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत. त्यांचा समाचार आपण घेत चाललेलोच आहोत आणि तो लवकर त्याचा निकाल लागेल.

याची मला खात्री आहे. परकला प्रभाकरनी सांगितलं होतं की लोकसभा ते विधानसभा या काळात 45 लाख मतदार हे जास्तीचे नोंदले गेले. आता हे आले कुठून मतदार? सहा महिन्यामध्ये 45 लाख जास्त नेमले गेले, नोंदले गेले आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये दोन कोटी कापले गेले. म्हणजे दोन कोटी कुठे कापले गेले? प्रत्येकाला तुम्हाला तुमची मतदार यादी आहे, तुम्हाला मतदार यादी पाठ असायला पाहिजे. कारण दोन कोटी जिथे गाळले गेलेत याचा अर्थ कदाचित मी असा लावला तर तो चुकीचा होणार नाही की पलीकडची लोकं हे दोन कोटी हे जास्त घुसवू शकतील उद्या. कारण आता वगळले गेलेत, त्यांची खातं जमा केली आणि आता त्यांची नावं आली. कुणाला कळणार आहे ते खरे आहेत की खोटे आहेत.

Published on: Sep 04, 2026 08:26 PM

Follow Us