AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अजित दादांना अडचणीत आणण्यासाठी फडणवीस यांच्याकडून…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा थेट आरोप

दोन समाजात वाद कसा निर्माण होईल हे भाजप पाहत आहे. 1998 ला पहिल्यांदा जीआर तुम्ही काढला. मग आता बावनकुळे, फडणवीस जनतेची माफी मागणार का? ललित पाटील याला पळून जायचं नव्हतं. पण, कोणत्या नेत्याचा फोन आला म्हणून तो गेला हे ही समोर आले पाहिजे.

'अजित दादांना अडचणीत आणण्यासाठी फडणवीस यांच्याकडून...', राष्ट्रवादीच्या आमदाराचा थेट आरोप
DEVENDRA FADNAVIS AND AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Oct 21, 2023 | 6:02 PM
Share

पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जनंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला. ठिकठिकाणी आंदोलन झाले. जालन्याला लाठीचार्च झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मावळचा मुद्दा बाहेर काढला. मनोज जरांगे पाटील यांनी समाजहितासाठी उपोषण केलं. सरकारने त्यांना समिती नेमण्याचे आश्वासन दिलं. समिती नेमली पण निर्णय काहीच घेतला नाही अशी टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केली.

आता सरकारने जरांगे पाटील यांच्याकडे आरक्षण देण्यासाठी मुदत मागितली. जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसाची मुदत दिली. मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही मुदत दिली. पण, सरकार काहीच निर्णय घेत नाही. समिती स्थापन करून सरकारकडून वेळखाऊपणा केला जात आहे. नारायण राणे यांना असं वक्तव्य करायला भाजपने सांगितलं असेल. दोन समाजात वाद कसा निर्माण होईल हे भाजप पाहत आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. असा निर्णय का घेतला अशी विचारणा होताच फडणवीस यांनी त्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले. 1998 ला पहिल्यांदा जीआर तुम्ही काढला. मग आता बावनकुळे, फडणवीस जनतेची माफी मागणार का? असा थेट सवाल त्यांनी केला.

महायुती सरकार अडीच लाख पदांची भरती करणार होते. मग आता त्याचे काय झालं? सरकारने निर्णय मागे घेतला हा विजय युवकांचा आहे. पण, संघर्ष इथेच संपला नाही. हा लढा सुरुच राहणार. खोटं बोलून. आरोप करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना उगीच बोलवून फटाके वाजवायला लावले असे रोहित पवार म्हणाले.

ललित पाटील याला पळून जायचं नव्हतं. पण, कोणत्या नेत्याचा फोन आला म्हणून तो गेला हे ही समोर आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित दादांना अडचणीत आणण्यासाठी काही प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. फडणवीस यांना निधी थांबविण्याचा अधिकार नाही. तरीदेखील निधी थांबवला हात आहे. अजित दादा यांच्या खात्यात हस्तक्षेप केला जातोय, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.