मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दत्तात्रय भरणे यांची सभागृहात मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे, शेतकऱ्यांना येत्या 5 जुलै रोजी कर्जमाफी मिळणार, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दत्तात्रय भरणे यांची सभागृहात मोठी घोषणा
farmer
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 29, 2026 | 7:58 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे, शेतकऱ्यांना येत्या 5 जुलै रोजी कर्जमाफी मिळणार, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे. कर्जमाफीच्या विषयात अटी व निकष यावर चर्चा झाली. प्राथमिक अंदादानुसार ५६ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अटी; निकष यात बदल होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपसमिती याबाबत निर्णय घेईल. मुख्यमंत्री मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. उद्या 30 जून आहे, 30 जून ला कर्जमाफी दिली जाईल, असं म्हटलं होतं. मात्र राज्यपालांची सही होऊन 5 जूलैनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाईल, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांना नव्या अ‍ॅपच्या  माध्यमातून खतं उपलब्ध करुन दिले गेले आहेत. अ‍ॅपमध्ये काही अडचणी येत असतील तर त्या देखील सोडवल्या जातील. एचटीबीटी कापसासाठी केंद्राकडून अद्याप परवानगी  मिळालेली नाहीये.  राज्यात 1119 खतविक्रीचे परवाने रद्द करण्यात आले आहे, राज्यात खत आणि बी बियाणांचा कोणताही तुटवडा नाहीये. सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढले जातील, केंद्र सरकारच्या आणि इतर योजनांकरता फार्मर आयडी गरजेचा आहे.  गावोगावी शिबीरे घेऊन हे फार्मर आयडी काढले जाणार आहेत. तालुका स्तरावर कृषीभवनाची मागणी केली आहे, याबाबत तातडीनं कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

अवकाळी पावसाची नुकसान भरपाई 

दरम्यान यावेळी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे राज्यात काही दिवसांपूर्वी मोठा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या, या अवकाळी पावसांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे. अवकाळी पावसाचा 17 जिल्ह्यांना फटका बसला आहे, बाधित क्षेत्रांचे पंचनामे सुरू असून, नुकसान भरपाई दिली जाईल असंही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

 

Follow Us