AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचे माजी मंत्री अजित पवार गटात जाणार? शिवसेनेचे बडे नेते म्हणाले, पक्ष बदलानंतरही आम्ही सोडणार नाही?

Gulabrao Patil and Gulabrao Deokar: अटलांटा घोटाळा आहे. घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा आहे. आता अजून त्यांची ही सर्व प्रकरणे बाहेर येतील. या सर्वांमध्ये त्यांचे हात बरबटलेले आहे. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शरद पवारांचे माजी मंत्री अजित पवार गटात जाणार? शिवसेनेचे बडे नेते म्हणाले, पक्ष बदलानंतरही आम्ही सोडणार नाही?
gulabrao patil and gulabrao deokar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 11, 2024 | 1:52 PM
Share

Gulabrao Patil and Gulabrao Deokar: जळगाव जिल्ह्यात दोन गुलाबमधील द्वंदाची चर्चा अधूमधून होत असते. शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे राजकीय शत्रूत्व चर्चेत असते. दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधून समोरासमोर लढले होते. त्यात गुलाबराव पाटील यांचा विजय झाला. गुलाबराव देवकर पराभूत झाल्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ते कोणत्याही पक्षात गेले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही.

काय म्हणाले गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, अटलांटा या घोटाळ्यांमध्ये अडकू नये, स्वतःच्या बचावासाठी गुलाबराव देवकर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही. मी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, अशी थेट धमकी वजा इशारा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना दिला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गुलाबराव देवकर यांना पक्ष बदलाची काय घाई झाली आहे. लगेच आठ दिवसांमध्ये या माणसाला पळावे लागत आहे. कारण त्यांनी जिल्हा बँकेत घोटाळा केला आहे. मजूर फेडरेशनचा दहा कोटींचा विषय आहे.

अटलांटा घोटाळा आहे. घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा आहे. आता अजून त्यांची ही सर्व प्रकरणे बाहेर येतील. या सर्वांमध्ये त्यांचे हात बरबटलेले आहे. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव पाटील पाच वेळा निवडून आले. ते महायुती सरकारमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गुलाबराव देवकर हे सुद्धा राज्यमंत्री राहिले आहेत.

Follow Us
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज