भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! देवदर्शनाहून परतणाऱ्या पिकअपला कंटेनरची धडक, 2 जण ठार
धाराशीवमधून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवच्या जवळील आळणी फाटा येथे पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात देवदर्शनावरून परतणारे 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवच्या जवळील आळणी फाटा येथे पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात देवदर्शनावरून परतणारे 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पिकअपमधील प्रवासी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात झाला आहे. 7 जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धाराशीवमध्ये भीषण अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, आळणी फाटा येथे देवदर्शनावरून भाविकांना घेऊन परतणाऱ्या पिकअपचा कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की यात पिकअपचा चुराडा झाला आहे. या अपघाता 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. बब्रुवान सूर्यवंशी (वय 68), छबुबाई दूधभाते (वय 52) अशी मृत भाविकांची नावे आहेत. हे दोघेही उमरगा तालुक्यातील बोरी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील जखमींना तातडीने धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जळगावमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू
जळगावमधील इच्छादेवी चौकात कार- दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे, यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. लीलाधर मंगल पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या 36 वर्षीय दुचाकीस्वाराचे नाव असून कंपनीत कामावर जाताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कारमधील चार जण देखील गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर कार दुभाजकाला धडकून दोन वेळा रस्त्यावर उलटली. या अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासह पुढील कारवाई सुरू आहे.
