उन्हामुळे अंगाची काहिली, पुढच्या दोन दिवसात काय होणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
राज्यात सध्या दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. तपामानात वाढ होत असल्याने काही ठिकाणी उष्माघाताच्याही घटना समोर आल्या आहेत. म्हणूनच उन्हात घराबाहेर पडू नका, पाणी भरपूर प्या असा सल्ला दिला जात आहे.

weather update
Image Credit source: tv9 marathi
- राज्यात सध्या दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. तपामानात वाढ होत असल्याने काही ठिकाणी उष्माघाताच्याही घटना समोर आल्या आहेत. म्हणूनच उन्हात घराबाहेर पडू नका, पाणी भरपूर प्या असा सल्ला दिला जात आहे.
- दरम्यान, आता पुढचे काही दिवस ही उष्णतेची लाट कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त नोंदवले गेले आहे.
- त्यामुळे अंगातून घामाच्या धारा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. म्हणूनच आता हवामान विभागाने उष्णतेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता उष्णतेची लाट कमी होऊ शकते. परंतु हा यलो अलर्ट अजूनही कायम आहे.
- येणाऱ्या काही दिवसांत तापमान दोन ते तीन अंशाने कमी होऊ शकते, अशी शक्यता आहे. तरीदेखील राज्यभरात बहुसंख्य ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही.
- म्हणूनच लोकांनी दुपारी एक ते चार वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडू नये. उन्हात बाहेर पडल्यावर जास्तीत जास्त पाणी प्यावे, डोक्याला रुमाल बांधावा, चहा, कॉफी पिणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Us