पावसाबद्दल हवामान तज्ज्ञांचा मोठा इशारा, शेतकऱ्यांना आवाहन, राज्यात पुढील 5 ते 6 दिवस..
Weather Department Forecast : राज्यात धो धो पावसाची वाट शेतकरी पाहात आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला होता. ज्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन अधिक वाढले आहे.

राज्यात ऑगस्ट महिन्यात हवा तसा पाऊस झाला नाही. फक्त जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला. आता सप्टेंबर महिनाही कोरडा जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पावसाच्या प्रतिक्षेत लोक आहेत. शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची वाट पाहात आहेत. पिके संकटात आहेत. त्यात पुढील काही दिवसात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. शेतकऱ्यांना ज्याची भीती तेच घडताना दिसतंय. पुणे हवामान विभाग प्रमुख एस. डी. सानप यांनी नुकताच मोठा इशारा दिला. खरीप पिके तर शेतकऱ्यांच्या हातून गेले आहेत. रब्बीची पिके देखील पावसावर अवलंबून आहेत. मात्र, पाऊस यावर्षी कमीच आहे, शेतकऱ्यांनी विचारपूर्वक पेरण्या कराव्यात, असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले.
राज्यात परतीच्या मान्सूनमध्ये देखील सर्व दूर पावसाची शक्यता नाहीच असे एस. डी. सानप यांनी म्हटले. 22 सप्टेंबर नंतर राज्यात प्रतीचा मान्सून बळवण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कोणत्याही स्वरूपाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला नसल्याने पाऊस हा तुरळकच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला.
येत्या 5 ते 6 दिवस कसल्याही स्वरूपाचा राज्यात पाऊस नसणार आहे, असे स्पष्ट शब्दात भारतीय हवामान विभागाने सांगितले. राज्यात पुढील 6 दिवस पाऊस नसणार असल्याचे मोठे विधान भारतीय हवामान विभागाने केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. राज्यात पाऊस कमी होत आहे. एल निनोचे मोठे संकट यंदाच्या मॉन्सूनवर असल्याचे स्पष्ट आहे.
राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. परतीचा पाऊस तरी चांगला होईल, अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र, परतीच्या पाऊसही समाधानकारक नसणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले. राज्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच जगभरातील हवामान तज्ज्ञ धक्कादायक इशारा एल निनोबद्दल देत आहेत. राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. दुष्काळाचे सावट राज्यावर आहे.