AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग, छत्रपती संभाजीराजे म्हणाले “आम्ही एकत्र…”

"कृषिमंत्री काय करतात, हे अजित पवार यांनी पाहावं, इकडे कृषी मंत्री म्हणायचं आणि दुसरीकडे धिंगाणा घालायचं", अशा शब्दात त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग, छत्रपती संभाजीराजे म्हणाले आम्ही एकत्र...
| Updated on: Sep 09, 2024 | 5:13 PM
Share

Maharashtra Vidhansabha election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जबरदस्त तयारी सुरु केली आहे. आता सध्या पक्षांच्या बैठका, जागावाटप, सभा, गाठीभेटींना वेग आला आहे. सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकासआघाडी अशा दोन आघाडी आहेत. आता राज्यातील छोटे पक्ष एकत्र येत तिसरी आघाडीसाठीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक, शेतकरी घटकपक्षांना एकत्रित येऊन तिसरी आघाडी स्थापन केली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

आता छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी परभणीत अतिवृष्टी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मानवत तालुक्यातील वजूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील तिसरी आघाडी स्थापना करण्याबद्दल भाष्य केले.

घरकुलच्या माध्यमातून घर दिले पाहिजे

“अतिवृष्टीमुळे नांदेड, हिंगोली आणि परभणी यापैकी परभणीत जास्त नुकसान झाले आहे. जवळपास 50 टक्के क्षेत्र बाधित झालं आहे. अतिवृष्टी झाली, ठीक आहे. पण आता पुढे पर्याय काय, यावर चर्चा होणं गरजेचं आहे. उद्या परत अतिवृष्टी झाली तर काय याचे उत्तर कोणी देत नाही. ज्यांचे घर पडले त्यांना घरकुलच्या माध्यमातून घर दिले पाहिजे”, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

अतिवृष्टीसारखी भीषण परिस्थितीची संवेदनशील विषय असताना सुद्धा कृषिमंत्री परळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून काय दाखवता येत हे महाराष्ट्राला शोभणार नाही. एकीकडे स्वतःला कृषिमंत्री म्हणायचं हे माझ्यासाठी शॉकिंग आहे. राज्य शासन गंभीर आहे, असं मला वाटत नाही. एक व्यक्ती म्हणाला मी आत्महत्या करतो. मी त्याला सांगितलं मात्र टोकाचे पाऊल उचलू नये. कृषिमंत्री काय करतात, हे अजित पवार यांनी पाहावं, इकडे कृषी मंत्री म्हणायचं आणि दुसरीकडे धिंगाणा घालायचं, अशा शब्दात त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

तिसऱ्या आघाडीबद्दल संभाजीराजे काय म्हणाले?

यानंतर त्यांना तिसऱ्या आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. आज आम्ही कोणतीही राजकीय चर्चा करणार नाही. शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे म्हणून आम्ही पाहणी करण्यासाठी आलोय. आमचा हेतू समान आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. बच्चू कडू ही दिव्यांग बरोबरच शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. यामुळेच आम्ही सर्वजण एकत्र आहोत, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं