1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही गंभीर आरोप केली. यादरम्यान त्यांनी ओबीसी आरक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. भाजपा नेते प्रसाद लाड आज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली.

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..
Manoj Jarange Patil
| Updated on: May 22, 2026 | 11:41 AM

भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता त्यांच्या घरी गेले. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेकरिता 23 मे 2026 पूर्वी माझ्याकडे या असे म्हटले होते. त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीकरिता गेले. यादरम्यान ते छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी असताना त्यांना धमकी देण्यात आली. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीकरिता जाण्यापूर्वी म्हटले होते की, मी भाजपा आमदार किंवा नेता म्हणून नाही तर माझ्या भावाच्या आणि मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे चर्चेकरिता जात आहे. प्रसाद लाड यांना मिळालेल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. स्वत: भागवत कराड हे प्रसाद लाड यांच्यासोबत दिसले.

मनोज जरांगे यांच्यासोबत बोलताना प्रसाद लाड भावूक झाल्याचेही बघायला मिळाले. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना बोलताना म्हटले की, आम्ही ओबीसीचे आरक्षण मागत नाहीत तर आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत. आमचे लेकरं आज दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, ऊसतोडी करतात, स्वत: जे वावर असूनही.

त्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिलं जातं. ओबीसीचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. तुम्हाला काय वाटतंय तेच आम्हाला कळत नाही. ओबीसी आरक्षणाला नेमका निकष काय लावला? आम्हाला तीन वेळा मागास सिद्ध केले तरीही आरक्षण मिळत नाही. 1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण दिले?

आमचे गॅझेट आहे तर आम्हाला आरक्षण द्या. मराठा समाजाला सरसगट प्रमाणतपत्रे का दिली जात नाहीत? 4 वर्षात ओबीसींची संख्या 30 टक्के वाढली कशी, असाही मोठा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या बोलण्याने पुन्हा एकदा मराठा विरूद्ध ओबीसी असा मुद्दा उपस्थित राहत आहे. यादरम्यान त्यांनी म्हटले की, मंडळाने कोणता सर्व्हे केला दाखवा, असेही त्यांनी म्हटले.

Follow Us