AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता ज्ञान शिकवायला लागले’, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे यांचं परखड भाष्य

"राज ठाकरे कदाचित मालवणला जातीलही पण आता उपयोग काय? कारण पुतळाच त्या ठिकाणी पडलेला आहे आणि नवीन पुतळा बांधणार असं बोललं जातंय. त्यामुळे राज ठाकरे नेहमी सांगतात की पुतळे महाराष्ट्रात बांधण्यापेक्षा जे किल्ले महाराज यांनी बांधलेत, त्याचे संवर्धन झालं पाहिजे"

'आता ज्ञान शिकवायला लागले', शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे यांचं परखड भाष्य
Raj & Sharmila Thackeray
| Updated on: Aug 29, 2024 | 2:57 PM
Share

“मला वाटतं केवळ मनसे असा असा एक पक्ष आहे, जो मराठी कलावंतांसाठी पुढाकार घेत त्यांच्या समस्या मांडण्यासाठी पुढे आला, इतर इतके दिग्गज मोठे पक्ष असून देखील त्यांना कधीही असं वाटलं नाही, मराठी कलावंतांसाठी काहीतरी करावं, यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीने मराठी कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. “मला केवळ एवढेच सांगायचे की पुतळा हा पोकळ कसा असू शकतो? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तरी भ्रष्टाचार करणे सरकारने थांबवलं पाहिजे” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. त्याला जवळपास साडेतीनशे वर्षे झाली आहेत, तो किल्ला अजूनही कोसळला नाही तो जसाच्या तसाच आहे. पण आपले पुतळे कोसळतात ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. “महाविकास आघाडी आता महायुती वरती टीका करतय, पण अस नाहीय की त्यांच्या काळामध्ये पुतळ्यासंदर्भात भ्रष्टाचार झालाच नाही, बलात्कार झालाच नाही, आता ज्ञान शिकवायला लागले. पण त्यांच्या काळातही तीच परिस्थिती होती त्यामुळे तराजूत जर दोघांना मोजलं तर दोघेही समानच आहेत” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

‘यातून सुटका नेमकी कधी होणार?’

“प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार होतोय. नाशिकचे रस्ते असू द्या तिथे लोक जायला धजावत नाहीत नाशिकहून मुंबईत यायचं झालं तर बारा बारा तास लागतात. लोक गाड्या पाठवून देतात पुढे आणि ट्रेनने स्वतः प्रवास करतात अशी अवस्था आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आम्ही आंदोलन केली पण अजूनही त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात यातून सुटका नेमकी कधी होणार?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे मालवणला जाणार का?

“राज ठाकरे कदाचित मालवणला जातीलही पण आता उपयोग काय? कारण पुतळाच त्या ठिकाणी पडलेला आहे आणि नवीन पुतळा बांधणार असं बोललं जातंय. त्यामुळे राज ठाकरे नेहमी सांगतात की पुतळे महाराष्ट्रात बांधण्यापेक्षा जे किल्ले महाराज यांनी बांधलेत, त्याचे संवर्धन झालं पाहिजे. त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे त्याचं जतन करा, पुतळा बांधत बसू नका” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.