Nawab Malik | नवाब मलिक यांना मंत्रिपदावर ठेवणे महाराष्ट्राचा अपमान, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं टीकास्त्र

मुंबईः नवाब मलिक (Nawab Malik) यांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं वक्तव्य भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केलं आहे. तुरुंगाच्या कोठडीतून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Nawab Malik | नवाब मलिक यांना मंत्रिपदावर ठेवणे महाराष्ट्राचा अपमान, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं टीकास्त्र
Image Credit source:
| Edited By: | Updated on: Apr 22, 2022 | 5:06 PM

मुंबईः नवाब मलिक (Nawab Malik) यांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं वक्तव्य भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केलं आहे. तुरुंगाच्या कोठडीतून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत , अशी जोरदार टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोन्डे , पॅनेलिस्ट समीर गुरव यावेळी उपस्थित होते. आता तरी मुख्यमंत्र्यांनी मलिक यांची हकालपट्टी करून महाराष्ट्राचा अपमान थांबवावा , असेही ते म्हणाले.

तेव्हाच हकालपट्टी करायला हवी – केशव उपाध्ये

तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून नवाब मलिक यांनी विक्रम केल्याची खरमरीत टीका उपाध्ये यांनी केली. ते म्हणाले, ‘ बेनामी मालमत्तांच्या व्यवहारातून गोळा केलेला पैसा दाऊदच्या दहशतवादी कारवायांना पुरविण्याचा आरोप असलेल्या मलिक यांची तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून नवा विक्रम केला आहे. खरे तर मलिक यांना अटक झाल्या झाल्या त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती. एरवी महाराष्ट्राच्या अस्मितेची भाषा वारंवार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्या मलिक यांची पाठराखण करताना महाराष्ट्राचा अपमान होतो आहे , याची जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे.

‘खुर्ची जपण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचा अपमान’

केशव उपाध्ये म्हणाले, ‘ गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावणाऱ्या कारवायांना सातत्याने प्रोत्साहनच दिले असून नवाब मलिक यांना तर त्यांनी चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रकही देऊन टाकले होते. शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील सचिन वाझे हा काही लादेन नाही, अशा शब्दांत त्याची प्रशंसाही केली होती. केंद्रीय मंत्री राणे यांच्या घरावर चाल करून जाणाऱ्यांच्या सत्कारास प्रोत्साहन देऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनोवृत्तीचे दर्शन महाराष्ट्रास घडविले होते. सातत्याने आपली खुर्ची जपण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, असेही उपाध्ये म्हणाले.

इतर बातम्या-

Navneet Rana in Mumbai : मी मुंबईची मुलगी, विदर्भाची सून, मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर नवनीत राणा ठाम, उद्याचा मुहूर्त

Video : लोक समुद्रकिनारी मजा करत होते, इतक्यात हेलिकॉप्टर कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं!