‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा

AIMIM Warish Pathan on CJP: AIMIM नेते वारिस पठाण, कॉक्रोच जनता पार्टीच्या बाजूने मैदानात उतरले आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारभारावर सुद्धा मोठा सवाल उपस्थित केला आहे. काय आहे हे प्रकरण? कुणावर केली त्यांनी टीका?

छपरी, गुंडा... या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा
AIMIM नेते वारिस पठाण
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 05, 2026 | 11:22 AM

Warish Pathan on Swatantra Bhardwaj: AIMIM चे नेते वारिस पठाण हे स्वतंत्र भारद्वाज यांच्याविरोधात आक्रमक झाले. त्यांनी CJP च्या FIR च्या मागणीवरून दिल्ली पोलिसांना सवाल केला. स्वतंत्र भारद्वाज यांनी अनेकदा वक्तव्य केले आहे की, त्यांनी दगडफेक केली आहे. तरीही त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत त्यांनी भारद्वाज यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली.

भारद्वाजविरोधात लवकर कडक कारवाई व्हावी

वारिस पठाण म्हणाले की, स्वतंत्र भारद्वाज यांनी अनेकदा वक्तव्य केले आहे की, त्याने दगडफेक केली आहे. तरीही त्यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. सीजेपीने सुद्धा भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भारद्वाज यांच्याविरोधात तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी पठाण यांनी केली. एक छपरी गुंडा एका पॉडकास्टमध्ये जातो. तो जाहिररित्या जंतरमंतरवरील कृत्याची कबुली देतो. सीजेपीच्या आंदोलनात अनेक विद्यार्थी हे घटनात्मक मार्गाने प्रदर्शन करत होते. त्यात अनेक मुली होत्या. त्यांचे पालक आले होते. त्यांचे आपण डोके फोडले, एका पोलिसांचा बुट आपल्याकडे असल्याची माहिती भारद्वाज या पॉडकास्टमध्ये जाहीरपणे देत असल्याचे पठाण म्हणाले.

मुलीला धमकी, पोलीस काय करत आहे?

या आंदोलनात सहभागी एका मुलीला धमकी येते. Gen Z विद्यार्थीनी आहे. ती प्रदर्शन करत होती. तिचे वडीलही होते. ते SC-ST प्रवर्गातील आहे. त्यांच्याविषयी अपशब्दांचा वापर करण्यात आला. अनेक जण त्यांना धमकावणाऱ्या पोस्ट करत आहेत. माझा प्रश्न असा आहे की, जाहिररित्या धमकावण्यात येत आहे. मग पोलीस काय करत आहेत असा सवाल त्यांनी केला. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दोन मुस्लिम महिला पत्रकारांना मारल्याचा दावा

वारिस पठाण यांनी दोन मुस्लिम महिला पत्रकारांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. एका वृत्तवाहिनीच्या दोन मुस्लिम महिला पत्रकारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर सवाल उपस्थित करताच त्यांना मारहाण झाल्याचा दावा केला. जेव्हा त्या मुस्लिम असल्याचे समोर आल्यावर अशी वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना मारहाण आणि जे खुलेआम धमकी देत आहेत, दगडफेक केल्याचे सांगत आहेत, त्यांच्यावर साधा एफआयआरही नाही असा दावा त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us