मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात येणाऱ्या या अर्थसंकल्पात 15 मोठ्या घोषणा केल्या. यात महिलांपासून शाळकरी मुली आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा आहेत. याशिवाय काही विकास प्रकल्पांचीही घोषणा करण्यात आली.
राज्याच्या अर्थसंकल्पातील 15 मोठ्या घोषणा
पुरोगामी महाराष्ट्रात फसव्या विज्ञानाचा प्रचार रोखणार
सध्याच्या काळात देशात जाणीवपूर्वक फसव्या विज्ञानाचा प्रचार होत आहे. हा छद्म विज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क उभारण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra budget 2021 ) करण्यात आली. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. सध्या देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रचार होत आहे.
अशा परिस्थितीत भावी पिढीच्या मनात अभिजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक महसूल मुख्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक अशा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईतील नेहरू सेंटरच्या नुतनीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
महिला दिनाच्या दिवशी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. यापैकी गृहलक्ष्मी या योजनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या योजनेनुसार राज्यात कोणतेही घर विकत घेतले जाईल तेव्हा त्या घराची नोंदणी महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाईल. 1 एप्रिल 2021 पासून या योजनेची अंमलबजावणी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :
कोरोनाचं संकट, पण रडगाणं न गाता सर्वसमावेशक अर्थसंकल्प : मुख्यमंत्री
Maharashtra Budget 2021 Ajit Pawar full speech : महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प
व्हिडीओ पाहा :
Ajit Pawar declared 15 big announcement in Maharashtra Budget 2021