AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईची श्रीमंती काय वर्णावी.. एकट्या शहरात 1,596 अब्जाधीश, अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्यांमध्ये भारत कोणत्या स्थानावर?

अहवालानुसार, 2026 पर्यंत मुंबईतील हे प्रमाण 29.6% पर्यंत वाढेल. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये UHNWIs ची संख्या 1,119 एवढी होती. ती आता 42.6% नी वाढली असून 2021 मध्ये ती 1,596 पर्यंत पोहोचली आहे.

मुंबईची श्रीमंती काय वर्णावी.. एकट्या शहरात 1,596 अब्जाधीश, अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्यांमध्ये भारत कोणत्या स्थानावर?
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 02, 2022 | 10:45 AM
Share

मुंबईः टाटा-बिर्ला-अंबानी आणि श्रीमंत बॉलिवूड स्टार्सच्या वास्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धनाढ्यांची (Mumbai billionaires) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर मुंबईतील अब्जाधीशांचा आकडा 1,596 एवढा गणला गेल्याने श्रीमंतांचं शहर अशी मुंबईची (Mumbai City) ख्याती अधिकच विस्तारणार आहे. जागतिक पातळीवरील नाइट फ्रँक्स नेटवर्थ रिपोर्ट (Knight Franks Net worth Report) 2022 चा अहवाल मंगळवारी जारी झाला. त्यात UHNWIs अर्थात अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असलेल्यांमध्ये मुंबईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. UHNWIs म्हणजे 225 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक संपत्ती आहे, असे व्यक्ती. जागतिक पातळीवर विचार केल्यास 2021 मध्ये भारतात अशा व्यक्तींची संख्या 11% नी वाढली आहे.

जगात आणि भारतात किती अब्जाधीश वाढले?

द वेल्थ रिपोर्ट 2022 नुसार, जगात UHNWIs ची संख्या 2021 मध्ये 9.3 टक्क्यांनी वाढली आहे. जगातील अब्जाधीशांची संक्या 6 लाख 10 हजार 569 एवढी झाली आहे. मागील वर्षी हा आकडा 5,58,828 एवढा होता. – भारतातील UHNWIs ची संख्या 2021 मध्ये 11 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी ही संख्या 12, 287 होती तर 2021 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 13,637 एवढी झाली आहे. – भारतातील शहरांचा विचार करता बंगळुरूमध्ये धनाढ्यांची संख्या जास्त वाढली आहे. येथील संख्या 17.1 टक्क्यांनी वाढून 352 वर पोहोचली आहे. दिल्लीत 12.4 टक्क्यांची वाढ होऊन ती 210 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील धनाढ्यांची संख्या आधीच जास्त होती. ती 9 टक्क्यांनी वाढून ही संख्या 1,596 वर पोहोचली आहे.

‘मुंबईतील धनाढ्य वाढतच जाणार’

UHNWI अर्थात अब्जाधीश लोकांनी नेहमीच मुंबईत राहण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईतील धनाढ्यांची संख्या वाढतच आहे. एका अहवालानुसार, 2026 पर्यंत मुंबईतील हे प्रमाण 29.6% पर्यंत वाढेल. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये UHNWIs ची संख्या 1,119 एवढी होती. ती आता 42.6% नी वाढली असून 2021 मध्ये ती 1,596 पर्यंत पोहोचली आहे.

श्रीमंतांची संख्या वाढण्याची कारणं काय?

नाइट फ्रँक इंडिया संस्थेचे एमडी शिशिर बैजल म्हणतात, इक्विटी मार्केट आणि भारतातील वेगाने वाढणारे डिजिटायझेशन यामुळे येथील अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे. तरुण आणि स्वावलंबी अब्जाधीशांची संख्या जास्त आहे. नव्या संकल्पनांमध्ये आणि नूतनाविष्कारांमध्ये त्यांची गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे UHNWIs आणि अब्जाधीश लोकांमध्ये निकोप वृद्धी होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल तसेच विविध क्षेत्रांमध्येही नव्या शक्ती उदयास येतील.

श्रीमंत शहरांतील जमीनीचे भाव काय?

नाइट फ्रँक वर्थ रिपोर्ट 2022 च्या अहवालानुसार, एक दशलक्ष डॉलर अर्थात 7.5 कोटी रुपयांमध्ये पुढील शहरांत किती जमीन येते, याचा अंदाज लावण्यात आला आहे. तो असा- मुंबई- 108.1 चौरस मीटर दिल्ली- 206.1 चौरस मीटर बंगळुरू- 357.3 चौरस मीटर मोनॅको (पश्चिम युरोपातील अब्जाधीशांचा देश)- 14.6 चौरस मीटर हाँग काँग (चीन)- 21.3 चौरस मीटर लंडन (ब्रिटन)- 36.6 चौरस मीटर

इतर बातम्या-

उधारीचे पैसे परत न दिल्याचा राग, नवी मुंबईत कामगाराकडून ठेकेदाराची निर्घृण हत्या

दारुच्या नशेत विनोद कांबळीची कारला धडक, कारमालकाशी वाद, माजी क्रिकेटपटूची दयनीय अवस्था | VIDEO Viral

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या