मागच्या चार वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक रखडली होती. मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती. आज 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मागची चार वर्ष प्रशासकामार्फत मुंबई महानगरपालिकेचा कारभार हाकण्यात आला. यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. ठाकरे बंधुंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून परस्परांचे स्पर्धक असलेली मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहेत. आज मतदान होत आहे. उद्या 16 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणी आहे. सर्वच पक्षांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत
महायुतीला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
ठाकरे बंधुंना 59 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
काँग्रेसला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इतरांना फक्त 7 जागा मिळतील असा अंदाज आहे.
जनमतच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
मुंबईमध्ये भाजपल शिवसेनेला 138 जागा मिळण्याचा अंदाज
तर शिवसेना ठाकरे गट मनसे युतीला 62 जागा मिळण्याचा अंदाज
तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला वीस जागा मिळण्याचा अंदाज
अभिनेते मकरंद देशपांडेंकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन
राजकीय आरोप- प्रत्यारोप चालत राहातील, पण आपण आपला हक्क बजवा – मकरंद देशपांडे
स्थानिक भाषा ही आलीच पाहिजे – मकरंद देशपांडे
जो इथे काम करतो त्याला स्थानिक भाषा आलीच पाहिजे – मकरंद देशपांडे
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी पत्नीसह केलं मतदान
माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी, कामात व्यस्त असल्यामुळे मतदानाला उशिर- सुर्वे
त्यांना काहीही करुद्या मात्र लोकांनी युतीला मतदान करायचं ठरवलं आहे, सुर्वे
शिवसेना कमीत कमी ५० जागा जिंकणार तर भाजप १०० – सुर्वे
सत्ता आमचीच येणार, प्रकाश सुर्वेचा दावा
राहुल शेवाळे यांचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर घणाघात
पराभवाच्या मानसिकतेतून ठाकरे गटाची पत्रकार परिषद
राहुल शेवाळे यांचा ठाकरे गटावर आरोप
लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी अशीच पत्रकार परिषद घेतली होती – राहुल शेवाळे
दोघे जण पराभव मान्य करू लागले आहेत आणि वातावरण तयार करत आहेत – राहुल शेवाळे
काही ठिकाणी मतदानानंतर लावण्यात येणारी शाई पुसरल्याचा आरोप
मतदान सुरू असतानाच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
निवडणूक आयोगानं आरोप फेटाळले
पूर्वी जो मार्कर पेन वापरत होतो, त्याच मार्कर पेनचा आताही वापर
शाई पुसरली जात असल्याचा आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
गोरेगावमध्ये बुथ सापडत नसल्याची मतदारांची तक्रार. बुथ सापडत नसेल तर मतदान करायचं कसं? मुंबई महापालिकेसाठी मतदान सुरु आहे. निवडणूक चार वर्ष विलंबाने होत आहे.
“उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांना डोळ्यासमोर पराभव दिसतोय. मुंबईचा निकाल आल्यानंतर ते अजून काहीतरी बोलतील. मुंबई सिंगापूरला देणारं असं वक्तव्य करतील. शेवटच्या घटका राहिल्या आहेत. उद्या 12 वाजता निकाल आल्यानंतर काहीतरी नवीन सांगतिलं” अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली.
जो पर्यंत मतदान होत नाही, तोपर्यंत मतपेट्या उघडत नाहीत. निवडणूक अधिकारी प्रभाग 200 ते 206 मध्ये त्यांनी आज दुपारी 3 वाजता टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंग रुममधून बाहेर काढण्याचे आदेश दिले. हा काय प्रकार आहे. मला एक मेसेज आला संविधान म्हणते मतदान करा. निवडणूक आयोग म्हणतं करूनच दाखवा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
निवडणूक जिंकण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शाई पुसण्याचे प्रकार काही झाले नव्हते. मला पत्रकारांनी विचारलं. त्यावर म्हणालो, निवडणुक आयुक्त पगार कसला खात आहेत?. चार वर्षानंतर निवडणुका होत आहेत. पण काही सुधारणा नाही. मग निवडणूक आयुक्त कसला पगार खातात? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
शाई पुसली का असा प्रश्न विचारला पाहिजे. भाजप आणि त्यांच्या मंडळींनी पुरेपूर प्रयत्न केला. दुबार मतदान असेल ईव्हीएमचा खेळ असेल. बाईचं नाव रवींद्र असेल का अशी बातमी आहे, पुरुष मतदाराचा पुढे फोटो. निवडणूक आयुक्तांसमोर याच गोष्टी ठेवल्या होत्या. शाई पुसण्याच्या तक्रारी येत आहेत. भाजपच्या उमेदवाराच्या नावाच्या पाट्या ठेवून मतदान केंद्र चालवलं जात आहे, कल्याण डोंबिवलीत. या मुद्यांकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं.
मुंबईतल्या धारावीमधल्या वॉर्ड क्रमांक 184 मधील प्रकार. मशाल चिन्हासमोरील बटण दाबलं जात नसल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांचा आरोप
मुंबईत 227 वॉर्डसाठी मतदान सुरु आहे. अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या तक्रारी येत आहेत. मुंबईत सकाळी 11.30 वाजेपर्यंत 25.87 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ते काय बोलणार? कुठली भूमिका घेणार? याची उत्सुक्ता आहे.
दादरच्या छबिलदास परिसरातील मतदारांची शाई निघत असल्याची तक्रार. मार्करने लावलेली शाई 10 मिनिटात निघत असल्याचा मतदाराचा दावा. थिनरने पुसली तर शाई पूर्णपणे पुसली जाईल असा मतदाराचा दावा
निवडणूक आयुक्त पगार कसला घेतात? याचा खुलासा झाला पाहिजे. निवडणूक आयुक्तांवर बंधन पाहिजे. मुंबई महापालिका निवडणूक 9 वर्षांनी होत आहे. निवडणूक आयुक्तांना त्यांच्या साईटवर आज त्यांनी काय केलं हे सांगण बंधनकारक केले पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
आम्ही सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणे मतदान केलेलं आहे. मी सर्व मतदारांना विनंती करेन की तुम्ही मतदानाचा हक्क बजावा. लोकशाही जिवंत ठेवा. सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच. नाव वगळली जात आहेत, शाई काही ठिकाणी पुसली जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दहिसर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 8 मधील मतदान केंद्रावर मतदान करत असताना आमदार मनीष चौधरी यांना भगव्या गार्डने अडवले.यानंतर, भगवागार्ड आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. मनसेचे भगवेगार्ड किरण नकाशे म्हणाले की, “येथे आम्ही ओळखण्यासाठी आहोत की पुन्हा मतदान करणारे मतदार आहेत की मृताच्या जागी मतदान करणारे दुसरे कोणी आहेत. मनीषा चौधरी बूथच्या आत होत्या, आम्ही निषेध केला की तिच्यासाठी वेगळा कायदा का आहे आणि आमच्यासाठी वेगळा कायदा का आहे” आमचा पोलिसांशी कोणताही वाद झाला नाही.
आज निवडणूक आहे. उत्सुकता आहे. आठ वर्षांपासून निवडणुका प्रलंबित होत्या. पण त्या आज होत आहेत. आज मतदान आहे. मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त वापर करून मतदान करावं असं मी मुंबईकरांना आवाहन करतो. प्रत्येक पाच वर्षांनी संविधानामधून अधिकार नागरिकांना मिळतो, आपला भवितव्याचा निर्णय घेण्याचा. त्याबद्दल आपण मतदान केलं पाहिजे. निवडणूक आयोगासोबत बैठक झाली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की नवीन मशीन आलेले आहेत अशा कोणत्या समस्या होणार नाहीत असं राहुल शेवाळे म्हणाले.
आज अजूनच वेगळं. आजपर्यंत शाई लावली जायची. आता नवीन पेन आणलय, त्या बद्दल बऱ्याच तक्रारी येत आहेत. बाहेर पडल्यावर सॅनिटायझर लावल्यावर ती शाई जातेय. काल उमेदवारांना एकदिवस वाढवून दिला. असा कोणताही नियम नाही. परत ते कशाला पैसे वाटायला. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्यापरीने जे काही शक्य आहे ते करतोय. ही काही चांगली लोकशाहीची लक्षण नाही. या असल्या निवडणुका देशात होणं, अशा फ्रॉड निवडणुकीमधून सत्तेवर येणं याला निवडणूक म्हणत नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असली पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.
आता पाडू नावाचं यंत्र मतमोजणीच्यावेळी वापरणार. विरोधी पक्ष नावाची गोष्ट ठेवायची नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणूक लढायच्या नाही. सरकार ठरवणार निवडणुका कशा जिंकायच्या. विधानसभेच्यावेळी त्यांनी हे केलं. आता हे मशीन आणलं. कोणत्याही राजकीय पक्षाला मशीन दाखवलेलं नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला.
सरकार कशा प्रकारची सिस्टिम चालवत आहे. ज्यावेळेला मी या गोष्टींची सुरुवात केली. येनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या त्यासाठी वाटेल ते करायचं. त्यासाठी सरकार प्रशासन दुबारचा विषय आहे. दुबारच्या विषयात सांगितलं, आमचा काही संबंध नाही असं सांगितंल. व्हीव्हीपॅट वापरणार नाही. आम्हाला कळतच नाही की, दाबलेलं बटण त्या चिन्हावर गेलं की नाही हे दाखवायला काही मार्ग नाही असं राज ठाकरे म्हणाले.
“मुंबई असेल महाराष्ट्रातील विविध महापालिका असतील. प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे आलेत. महाराष्ट्रातील मतदार, लोकशाही प्रगल्भ आहे. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशा लोकांशी मी बोलतोय. जो आमचं जीवन सुकर करेल अशाच पक्षाला आम्ही मतदान करु, असं मला लोकांच्या बोलण्यातून जाणवलं” असं भाजप नेते विनोद तावडे म्हणाले.
“भाजप 100 च्या वर आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 50 च्या पुढे जाईल. 150 च्या वर एवढा प्रचंड जनाधार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन लोक देतील असं मला वाटतं. आता या ठिकाणी महायुतीचा महापौर बसेल. महापौर कोण? यापेक्षा मुंबईला काय देणार हे महत्वाचं आहे” असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले.
आमदार चित्रा वाघ यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारला लोक निवडून देतील. राज्यातील महानगरपालिकेमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष असणार आहे. महापालिकेमध्ये गेल्या 35 वर्षात ठाकरे बंधूंनी काय वाट लावून ठेवलेली आहे. हे लोकांना माहित आहे, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची ठाकरे बंधूंवर टीका.
इथे शिट्टीच वाजणार आणि जोरात वाजणार. विजय होईल असा विश्वास आहे. इथे संमिश्र मतदार आहे. या सगळ्यांची कामे आम्ही केली आहेत. जी मेहनत केलीय, त्याला जनता प्रतिसाद देणार. 16 तारखेला कळेल की आमच्या सोबत कीती लोक आहेत, असं अरुण गवळी यांची लेक गीता गवळी म्हणाल्या
“मुंबईत जे इन्फ्रास्ट्रक्चर बनतय, कदाचितच सध्या जगात असं कुठे सुरु असेल. आपण साथ दिली पाहिजे. आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. या शहराला आपलं समजा. माझ्यासाठी मुंबई माझी कर्मभूमी आहे. माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. मी दुसर्याच्या घरात आलोय. कर्मभूमीने मला सगळं काही दिलंय. मुंबईने जे दिलं त्यामुळे मला ओळख मिळाली. मला एक सेकंद लागला मतदानाला. मला माहितीय माझ्या भागात कोण चांगलं काम करतय. या आणि मतदान करा. मग रडत बसू नका. रडायचं बंद करा. आपलं शहर आहे. जगातील नंबर 1 शहर बनेल” असं सुनील शेट्टी मतदानानंतर म्हणाला.
मुंबईत आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झालीय. पहिल्या दोन तासात किती मतदान झालं? त्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.98 टक्के मतदान झालं आहे.
दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथील एका मतदान यंत्रात बिघाड. विशाखा राऊत यांच्यासमोरील बटण दाबलं जात नाही अशी तक्रार काही मतदारांनी केली. 20 मिनिटं मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदारांच्या तक्रारीनंतर मशिन बदलण्यात आली.
“मी मुंबईकारांना विनंती करते की, तुम्ही मत दिलं पाहिजे. मुंबईत चांगली हवा पाहिजे, खड्डेमुक्त रस्ते पाहिजेत, प्रगती पाहिजे, सुरक्षा पाहिजे, तर आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. माझा मत देण्याचा अधिकार मी वापरला. मुंबई उत्तम शहर आहे. सर्वांनी साथ दिली पाहिजे. मी मुंबईकरांना विनंती करते की त्यांनी मतदानाचा हक्क बजावा” असं हेमा मालिनी मतदानानंतर म्हणाल्या.
“महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल. मला आश्चर्य वाटतं घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं 40 लोकं ठार झाले. दुर्देवी घटना होती. मी काल पाहिलं, त्या भूखंडावर सुद्धा अदानीचा बोर्ड लागलेला आहे. हा भूखंड अदानीने घेतला. ही राक्षसी भूक भाजप आणि त्यांना पोसणाऱ्या उद्योगपतींची आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“मुंबईत काय होणार? याकडे फक्त देशाचचं नाही, तर जगातल्या अनेकांच लक्ष आहे. मुंबईत काय होणार? मुंबईवरती कोणाचा ताबा असेल? कोण जिंकेल? मुंबईच्या आजच्या मतदानावर प्रेसिडंट ट्रम्पही लक्ष ठेऊन असतील. मुंबईच्या संदर्भात ही जी लढाई सुरु झालीय ती फक्त या निवडणुकीपुरती नाही” अस संजय राऊत म्हणाले.
“माझं मतदान मुंबईत करतो. मतदान करणं ही अस्तित्वाची खूण आहे. तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल कृपया बाहेर पडा आणि त्याला मतदान करा” असं नाना पाटकेर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर म्हणाले.
“मतदान करायला आलोय. प्रत्येक मत मॅटर करतं. म्हणून मी विनंती करतो येऊन मतदान करा. आपला विचार इथे येऊन मांडा, हीच वेळ आहे. मतदानाचा नीट वापर करा” असं प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर म्हणाला.
“अतिशय चांगलं वातावरण आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार. महायुती मुंबईत 150 जागा जिंकणार” असा विश्वास मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
सचिन तेंडुलकर मतदानासाठी सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल झालाय. त्याच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर आहे. वांद्रयातील मतदान केंद्रावर सचिन आला आहे. सध्या तो मतदानासाठी आत गेलाय.
मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या चिवडा गल्लीतील मशीनमध्ये बिघाड झाला होता. मतदान मशीन सुरू करण्यात आलेलं आहे. तांत्रिक कारणामुळे मशीन बंद झालं होतं. मात्र तात्काळ दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना अर्धा तास वाट बघावी लागली. त्यामुळे चिवडा गल्लीतील 235 नंबरच्या मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी मतदारांच्या मोठा उत्साह दिसून येत आहे.
“दुबार मतदारांचा घोळ आधीच घालुन ठेवलाय. पाडू नावाचं मशिन आणलय. मुंबईकर प्रतिकुल पारिस्थितीत मतदान करतायेत. भगवा गार्ड लोकशाही मजबूत करण्यासाठी येतय. तुमचे पैसे सापडले, गुंड पुंड सापडले तुमच्यावर कारवाई का नाही?. दुबार मतदार सापडले तर कार्यक्रम होईलच” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईत सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. वांद्रयाच्या माऊंट मेरी स्कूलमध्ये EVM मशीन बंद पडलेलं. 15 मिनिटानंतर EVM मशीन सुरु झालीय.
“मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी पंधरा वर्षे जुनी मशीन लावण्यात आलेली आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. मात्र लालबागच्या 235 मतदान केंद्रावर आठ वाजेपर्यंत मतदानात सुरू झालेलं नाही. निवडणूक आयोगाच्या चुकीच्या नियोजनामुळे मतदारांना त्रास सोसावा लागत आहे. मशीन बंद पडल्यानंतर पाडू मशीनची व्यवस्था आहे. मात्र ती सुद्धा सुरु नाहीय” अशी टीका शिवसेना सचिव सुधीर साळवी यांनी केली.
राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबई पब्लिक स्कुल गोरेगाव पूर्व पहाडी शाळेत बजावला मतदानाचा हक्क. राम नाईक आता 92 वर्षांचे आहेत. ते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत. गोरेगाव प्रभाग क्रमांक 51 चे ते मतदार आहेत.
प्रभाग क्रमांक 210 सेंट मेरी हायस्कूल मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात. या प्रभागात उद्धव ठाकरे गटाच्या सोनम जामसुतकर, भाजपचे संतोष राणे आणि काँग्रेसमधून अनिल वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी कामावर जाण्यापूर्वी मुंबईकर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत . सकाळी 10 वाजता मनसे नेते बाळा नांदगावकर देखील याच केंद्रावर आपला मतदनाचा हक्क बजावणार आहेत.
दुबार मतदान करणाऱ्यांना फोडून काढण्याच आव्हान ठाकरेंनी केलय. त्यावर अमित साटम म्हणाले की, “काही लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाहीय. स्वत:चा पराजय दृष्टीपथात दिसल्यामुळे त्यांची चलबिचल झाली आहे. त्यामुळे ते अशी बालिश आव्हान देताना दिसतायत”
“मी मुंबईकरांना आवाहन करतो की, विकसित निर्मितीच्या मुंबईसाठी, मुंबईची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी, मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार विरहीत प्रशासन देण्यासाठी महायुतीला साथ द्यावी” असं अमित साटम म्हणाले.
“मुंबईकरांचे आशिर्वाद, फडणवीस साहेबांचं पाठबळ आणि केंद्रीय नेतृत्वाने दिलेले आशिर्वाद यामुळे येणाऱ्या काळात मुंबईकर भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीला आशिर्वाद देताना दिसतायत. आजचा दिवस मुंबईकरांच्या भविष्याच्या, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे” असं अमित साटम म्हणाले.
“मुंबईकरांना हे चांगलं माहित आहे मराठी माणसाचा, मुंबई शहराचा विकास कोणी केला? मुंबई शहराची सुरक्षितता कोण अबाधित ठेऊ शकतं.मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार सर्व भक्तांना आहे. परंतु कोविडच्या काळात मंदिर बंद करणारे आज स्वत:च्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसतायत. आज त्यांना देवदेवता आठवले, हिंदुत्व आठवलं हे चांगलं आहे” असं टीका करताना अमित साटम म्हणाले.
“मराठी माणसाचं अस्तित्व नाही, तर मुंबई महानगरपालिकेला स्वत:च्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे त्यांची धडपड दिसत आहे. गेल्या 11 वर्षात मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने जे काम झालं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वरळी बीडीडी चाळीत 160 फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
सुरक्षित मुंबई निर्माण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा, आजचा हा दिवस मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून मुंबईतल्या भविष्यातल्या पिढ्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने हा दिवस ऐतिहासिक ठरो अशी सिद्धीविनायकाच्या चरणी प्रार्थना केली, असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपकडून घोसाळकर कुटुंबातील तेजस्वी घोसाळकर आणि वॉर्ड क्रमांक 7 मधून ठाकरे शिवसेनेकडून सौरभ घोसाळकर निवडणूक लढवत आहेत. घोसाळकर कुटुंब आज एकत्र मतदान करणार आहे. पण त्यापूर्वी ते घरी पूजा करतील.
चेंबूरच्या प्रभाग 153 मध्ये स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते आणि ठाकरेंचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण. मध्यरात्री काही जण पोलिंग बूथवर बोगस आयडी घेऊन शिरल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. रविंद्र महाडीक नामक इसमाला मध्यरात्री गोवंडी पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी हा 33/44 घाटाला बीएमसी शाळेत पोलिंग बूथमध्ये घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी त्याला रात्री 1.30 वाजता रंगेहाथ पकडलं. मध्यरात्री परिसरात तणावाचे वातावरण. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. इलेक्शन आरओ सुद्धा आले होते.
सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा जुहू येथील गांधी शिक्षण मंडळ येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असं आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. थोड्याच वेळात मुंबईमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ठाकरे बंधुंसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे.