AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात…ही आहे आमदारांची भावना…

आमदार संजय पत्रावर लगेच एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत ही भावना आमदारांची आहे, असे म्हणत एका ओळीत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरचा अडचणींचा पाढा आता संपायचं नाव घेत नाहीये.

Eknath Shinde : भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात...ही आहे आमदारांची भावना...
भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात...ही आहे आमदारांची भावना...Image Credit source: Social Media
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 23, 2022 | 1:29 PM
Share

गुवाहाटी : राज्याचं राजकारण हे सध्या प्रचंड इमोशनल वळणावर पोहोचले आहे. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत शिवसैनिकांना भावनिक साद घातली. त्याचा परिणामही राज्यातील जनतेने अगदी काही मिनिटात पाहिला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा ते मातोश्री प्रवासातली गर्दी अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी होती. मात्र यानंतर आता एका बंडखोर शिवसेना आमदाराने (Shivsena MLA in Assam) थेट उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिलंय. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांणा उधाण आले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना आमदारांची अडचण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या न भेटण्यावर आणि आजुबाजुच्या लोकांच्या वागण्यावरही त्यांनी बोट ठेवलं आहे. या आमदार संजय पत्रावर लगेच एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत ही भावना आमदारांची आहे, असे म्हणत एका ओळीत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरचा अडचणींचा पाढा आता संपायचं नाव घेत नाहीये.

एकनाथ शिंदे यांचं आणखी एक ट्विट

शिवसेना आमदाराच्या पत्रात नेमकं काय?

या ट्विटवर आणि पत्रावर आता भरभरून प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. तसेच गेल्या अडीच वर्षातल्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कावरही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय, असे म्हणत शिरसाट यांनी या पत्राची सुरूवात केली आहे. ते पुढे आपल्या पत्रात म्हणतात, काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती, असा थेट आरोप हा शिरसाठ यांनी केला आहे.

पराभवाचं खापरही आजुबाजुच्या लोकांवर फोडलं

तर हेच so called वडवे, आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यावर बोललेल्या शब्दांची आठवण करून देणारे हे शब्द या पत्रात वापरले आहेत, ते पुढे पत्रात म्हणतात, विधान परिषदेचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. असे म्हणत त्यांनी या पराभवाचं खापरही उद्धव ठाकरेंच्या आजुबाजुच्या लोकांवर फोडलं आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश | मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही..असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही बोट ठेवलं आहे. तर या काळात एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली म्हणत शिंदेंसोबत असण्याचे कारणही सांगितलं आहे.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?