AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update: राज्यातील आजची रुग्णसंख्या एक हजारावर; 24 तासात 1 हजार 81 रुग्णांची झाली नोंद

राज्यात आजपर्यंत 4032 एवढे रुग्ण कोरोना बाधित असून मुंबईतील बाधित रुग्णांचा आकाडा 10,65, 619 एवढा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात कमी नोंद झाली आहे.

Corona Update: राज्यातील आजची रुग्णसंख्या एक हजारावर; 24 तासात 1 हजार 81 रुग्णांची झाली नोंद
कोरोना अपडेट
| Updated on: Jun 01, 2022 | 7:16 PM
Share

मुंबईः राज्यात आज 1 हजार 81 कोरोना रुग्णांची (Corona) नोंद झाली असून राज्यात कोरोना रुग्णसंख्येने हजारीचा आकडा पार केला आहे. आजच्या दिवशी 524 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत 77, 36, 275 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.7 टक्के एवढे झाले आहे. आजच्या दिवशी एकाच दिवसात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आजच पावसाळ्याच्या धर्तीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यातच आज कोरोना रुग्णांनी हजारीचा आकडा पार करण्यात आल्याने आरोग्य विभागाकडून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात आजपर्यंत 4032 एवढे रुग्ण कोरोना बाधित असून मुंबईतील (Mumbai) बाधित रुग्णांचा आकाडा 10,65, 619 एवढा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात कमी नोंद झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी संख्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी राज्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या मात्र वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के एवढा आहे.

आज रुग्ण संख्या वाढली

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 78,88,167 इतकी झाली आहे. तर जिल्हा आणि महानगरपालिकानिहाय रुग्णांची संख्या काही ठिकाणी वाढताना दिसून येत आहे तर काही ठिकाणची कोरोनाबाधितांचा संख्या स्थिर राहिली आहे. मात्र राज्यातील आजची कोरोना बाधितांची आकडेवारी ही वाढलेली दिसून आली आहे.

भिवंडीत एकही रुग्ण नाही

मुंबई महानगरपालिकेत 739 बाधित रुग्ण संख्या असून एकूण कोरोना बाधितांचा आकडा जास्त आहे तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूरमध्ये एकाही रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून आले नाही.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.