AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐतिहासिक बहुमताचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा राज्याभिषेक होणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्रीपदाची लवकरच शपथ घेणार आहेत. येत्या २-३ दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. त्यानंतर ५ तारखेला त्यांचा शपथविधी होऊ शकतो. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल याबाबत उत्सूकता आहे.

ऐतिहासिक बहुमताचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा राज्याभिषेक होणार
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 30, 2024 | 1:12 AM
Share

मुख्यमंत्री कोण हे निकालानंतर ठरवू असं महायुतीचे तिन्ही नेते म्हणत होते. त्यानुसार दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक झाली. आणि देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं. आता फक्त आमदारांच्या बैठकीत नेता निवड होऊन, औपचारिकता पूर्ण होईल. छप्पर फाडूनच भाजप महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि आता या ऐतिहासिक बहुमताचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत.

दिल्लीत अमित शाहांसोबतच्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं, हे सांगण्यासाठी हा फोटो फार बोलका आहे. अमित शाहांना बुके देताना फडणवीसांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे तर शिंदेंच्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नाहीत. आता केंद्रातील निरीक्षकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत फडणवीसांची नेता निवड करुन, औपचारिक मोहोर उमटवण्यात येईल.

शिवसेनेकडून किमान 2 वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न झाले. पण 132 आमदारांच्या तगड्या संख्याबळापुढं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर टिकली नाही. त्यामुळं पूर्ण 5 वर्ष फडणवीसांच्याच नेतृत्वात महायुतीचं सरकार असेल.

लोकसभेच्या निकालात महायुती विषेशत: भाजपला जबर फटका बसला. 23 खासदारांवरुन भाजप 9 वर आली. त्यातच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना नाव घेवून तू राहशील किंवा मी राहील म्हणत खुलं आव्हान दिलं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी असं काही बाऊंस बॅक केलं की महायुती 230 वर आणि महाविकास आघाडी 49वर आली.

प्रचारात उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधली शाब्दिक लढाई चक्रव्युहापर्यंत आली होती. पण आपण आधुनिक अभिमन्यू असल्याचं सांगत फडणवीसांनी 132 आमदार आणून ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. भाजपनं 149 जागांवर उमेदवार दिले…त्यापैकी 132 जागा जिंकल्या…तब्बल 88.59% स्ट्राईक रेट भाजपचा राहिलाय. तर फडणवीसांना चक्रव्युहात अडवण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना स्ट्राईक रेट फक्त 20.83 % आहे. ठाकरेंनी 96 जागांपैकी फक्त 20 जागा जिंकल्या.

महाराष्ट्रात प्रचार बटेंगे तो कटेंगेपासून एक है तो सेफ है आणि धर्मयुद्धापर्यंत आला. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानींनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंसाठी व्होट जिहादचं उघड आवाहन केल्यानंतर, फडणवीसांनी धर्मयुद्धाची घोषणा केली.

फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं, तर व्होट जिहादच्या विरोधातला सामना ते जिंकलेत आणि आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनाही, विदर्भातला मुख्यमंत्री होत असल्यानं आनंद झालाय .तर संजय राऊतांनीही फडणवीसांचं स्वागत केलंय.

2014 ते 2019 पर्यंत पूर्ण 5 वर्षे…आणि 2019 मध्ये 72 तासांसाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता, तिसऱ्यांदा फडणवीसांचा राज्याभिषेक होणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी