मुंबई : आकाशात जाणाऱ्या इमारती, धूर ओकणाऱ्या गाड्या असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे. निसर्गाशी छेडछाड केल्यामुळे येथील वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. एका अभ्यासामध्ये तर मागील 27 वर्षात मुंबईचे तापमान चक्क दोन अंशांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे मुंबईतील वातावरणीय बदलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
नवी दिल्ली येथील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, हैदराबाद मधील उस्मानिया विद्यापीठ आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठातील संशोधकांनी एक अहवाल दिला आहे. या अहवालात मुंबईतील वातावरण बदलावर धक्कादायक निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. निष्कर्ष मांडण्यासाठी संशोधकांनी उपग्रहांची मदत घेतली आहे. त्यांनी मुंबई तसेच उपनगरांचा अभ्यास केलाय.
या अभ्यासामध्ये मुंबईने 1991 ते 2018 या काळात 40 टक्के जंगल आणि झुडपे असलेली जमीन, तब्बल 81 टक्के मोकळी जागा तसेच 30 टक्के जलक्षेत्र गमावल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे मुंबईतील वातावरणात मोठा बदल झालाय. फक्त सत्तावीस वर्षात मुंबईचे सरासरी तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. तशी माहिती या संशोधनात देण्यात आली आहे. या संशोधनात मुंबई तसेच उपनगरातील 603 चौरस किलोमिटरचा अभ्यास करण्यात आला आहे.
मुंबईतील वातावरणीय बदल तसेच तापमानवाढीला फक्त हवामान बदल कारणीभूत नाहीये. तर अमर्याद वाढलेले बांधकामसुद्धा वातावरण बदलासाठी कारणीभूत ठरले आहे. 1991 ते 2018 या काळात मुंबईमध्ये बांधकाम क्षेत्रात तब्बल 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इतर बातम्या :
ऊस परिषदेत राजू शेट्टींचा एल्गार, ऊस एफआरपीच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि भाजपवर हल्लाबोल
SSC HSC Board Supplementary Exam Result | इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा बुधवारी निकाल
Devendra Fadnavis | ‘सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार’ – देवेंद्र फडणवीस -tv9 #Devendrafadnavis | #bjp | #AmitShah | #raosahebdanve | #Maharashtra pic.twitter.com/YcpE56Bujg
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2021
(due to construction and environment change in 27 years mumbai temperature increased by 2 degree celsius)