100 युनिटपर्यंत वीजबिल माफीचा प्रस्ताव पूर्णपणे बारगळलेला नाही, आम्ही त्यावर विचार करतोय : नितीन राऊत

| Updated on: Nov 21, 2020 | 9:49 AM

ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल," असेही उर्जामंत्र्यांनी सांगितले. (Energy Minister Nitin Raut On Lockdown Electricity bill issue)

100 युनिटपर्यंत वीजबिल माफीचा प्रस्ताव पूर्णपणे बारगळलेला नाही, आम्ही त्यावर विचार करतोय : नितीन राऊत
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर टीकाटिप्पणी सुरु आहे. त्यातच आता पुन्हा एकदा उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला पुन्हा आश्वासन दिलं आहे. राज्यातील घरगुती वीजग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याचा विचार अजूनही कायम आहे, असे नितीन राऊत म्हणाले. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Energy Minister Nitin Raut On Lockdown Electricity bill issue)

“काही दिवसांपूर्वी मी 100 युनिटपर्यंत वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हटलं होतं. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही.”

“आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. पण जनतेला 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल,” असेही उर्जामंत्र्यांनी सांगितले.

गेल्या सरकारनं थकबाकीचा डोंगर उभा केलेला आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. लघू दाब, उच्च दाब, सौर यंत्रणेद्वारे वीज जोडण्यांना गती मिळणार आहे. थकबाकीसाठी व्याज आणि दंड माफ करून थकबाकी भरण्याची सवलत देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कृषी पंपांची थकबाकी 40 हजार कोटीपर्यंत आहे. मार्च 2014 अखेर महावितरणाची थकबाकी 14154 कोटी होती. ही थकबाकी 59148 कोटीपर्यंत गेली आहे. त्याची निश्चित चौकशी केली जाईल. याबाबत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असेही नितीन राऊत म्हणाले. (Energy Minister Nitin Raut On Lockdown Electricity bill issue)

संबंधित बातम्या : 

वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही : नितीन राऊत

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक