AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस, फडणवीस, फडणवीस खूप झालं, भास्कर जाधव असं का म्हणालेत

त्यामुळं त्यांनी समर्थन केलं की नाही, हे तुम्ही ठरवा, असंही भास्कर जाधव म्हणाले.

फडणवीस, फडणवीस, फडणवीस खूप झालं, भास्कर जाधव असं का म्हणालेत
भास्कर जाधव असं का म्हणालेतImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 10, 2022 | 7:58 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भास्कर जाधव म्हणाले, सध्या फडणवीस, फडणवीस, फडणवीस खूप झालेलं आहे. मला काही त्यांच्याबद्दल द्वेष नाही. परंतु, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कानाखाली मारीन असं म्हटलं होतं. त्यावेळी फडणवीस काय म्हणाले,नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण, पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

कंगना राणावत या शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाल्या, आम्ही त्यांचं समर्थन करत नाही. पण, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. राज्यपालांनी लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज, महाराष्ट्र यांचा अपमान केला. तेव्हा फडणवीस काय म्हणाले, आम्ही त्यांच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण, आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत.

त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे कुठल्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत. परंतु, महिलांच्या बाबतीत समर्थन करत नाही, हे सांगितलं. दुसरीकडं खोके खोके बोलू नका हे सांगितलं. त्यामुळं त्यांनी समर्थन केलं की नाही, हे तुम्ही ठरवा, असंही भास्कर जाधव म्हणाले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही चांगली मजल मारली. आता येणाऱ्या निवडणुकीतही निखळ यश आमचं असेल, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

कोर्टाचे ईडीवरील ताशेरे केंद्राच्या प्रवृत्तीवरील ताशेरे असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. कोर्ट म्हणाले, संजय राऊत यांचा या घटनेशी दुरान्वयानंही संबंध नाही. प्रवीण राऊत यांच्यावर दिवाणी स्वरुपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

परंतु, राकेश वाधवा यांना पत्राचाळ प्रकरणी खऱ्या अर्थानं जबाबदार धरलं पाहिजे होतं. ते मोकाट सुटलेत. पण, ज्यांचा संबंध नव्हता, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. तत्परता कुठं दाखविता, असंही भास्कर जाधव यांनी ईडीला सुनावले. या सर्व प्रकारामुळं संजय राऊत यांना, त्यांच्या कुटुंबीयांना, ठाकरे गटाला मानसिक त्रास झाला.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.