मुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना

| Updated on: Feb 23, 2020 | 8:09 AM

गेल्या वर्षभरात मुंबईत तब्बल 13 हजार 150 दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली (Mumbai accident cases increase) आहे.

मुंबईत आग लागून, इमारतींचे भाग कोसळून मृत्यूचे प्रमाण वाढलं, वर्षभरात तब्बल 13 हजार दुर्घटना
Follow us on

मुंबई : जागतिक दर्जाचं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत दररोज दुर्घटना घडत (Mumbai accident cases increase)  असतात. मुंबईत दुर्घटनांचे सत्र कमी होताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात मुंबईत तब्बल 13 हजार 150 दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे. यात 179 जणांचा मृत्यू झाला असून 722 जण जखमी झाले आहेत. यात आग, इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळून मृत्यू झाल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मुंबईत आग लागण्याचे प्रमाण वाढते आहे. पावसाळ्यात झाडे पडणे, घर, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅस गळती होऊन सिलेंडर स्फोट, तसेच नाले, मॅनहोल, नदी, समुद्र- खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅलहोलमध्ये पडून रस्त्यावर अपघात यासारख्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

गेल्या 1 जानेवारी 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत एकूण 13 हजार 150 दुर्घटना घडल्या. यात 179 जणांचा मृत्यू झाला. यात 132 पुरुष आणि 47 स्त्रियांचा समावेश आहे. तर 722 जण जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी माहिती अधिकारातून ही माहिती (Mumbai accident cases increase) दिली.

तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात मुंबईत आग आणि शॅार्टसर्किटच्या 5 हजार 254 घटनांची नोंद झाली आहे. यात 38 जणांचा मृत्यू झाला. तर 216 जण जखमी झाले.

त्याशिवाय घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या 1 हजार 003 घटना घडल्या. त्यात 57 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 299 जण जखमी झाले.

झाडे, झाडांच्या फांद्या पडण्याच्या 4 हजार 938 दुर्घटनांची नोंद झाली आहे. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले आहेत. समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, मॅनहोलमध्ये पडण्याच्या 128 दुर्घटना घडल्या. यात 62 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी (Mumbai accident cases increase) झाले.