AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-अमेरिका संघर्षादरम्यान नवा डाव समोर; दबक्या पावलाने भारताची एन्ट्री, नेमकं काय घडलं?

भारताने काल 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यावेळी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

इराण-अमेरिका संघर्षादरम्यान नवा डाव समोर; दबक्या पावलाने भारताची एन्ट्री, नेमकं काय घडलं?
iran -india Image Credit source: tv9
| Updated on: Aug 16, 2026 | 7:35 AM
Share

पश्चिम आशियात इराण-अमेरिकेत संघर्ष सुरूच आहे. या संघर्षाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. या संघर्षाचे परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान नवा डाव समोर आला आहे. दोन्ही देशात संघर्ष सुरू असताना दबक्या पावलाने भारताची एन्ट्री झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी भारताला 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भारत आणि इराणमधी नाते आणखी मजबूत करून पुढे जाण्याची इच्छा दर्शवली आहे, अशा शब्दात भारताला शुभेच्छा मिळाल्याने जगात चर्चांना उधाण आलं आहे.

इराणच्या दुतावासाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पेजेशकियान यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनी व्यापारी संबंध आणखी चांगले बनवण्याची संधी असल्याचे म्हटलं आहे. यावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेशकियान यांनी भारत आणि इराणमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक नात्यांचा उल्लेख केला. दोन्ही देशांमधील नाते जुने आणि चांगले असल्याचं त्यांनी सांगितले. पेजेशकियान यांच्या मते सामायिक हितांच्या आधारावर दोन्ही देश संबंध आणखी दृढ करण्यासाठी आग्रही राहील.

इराणचे राष्ट्राध्यक्ष यांनी पुन्हा म्हटले की, तेहरान भारतासोबत नाते आणखी चांगले करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. विश्वास आणि सन्मानाच्या वातावरणात दोन्ही देशांच्या हितांसाठी चांगले पावले उचलण्यासाठी तयार आहे. तसेच भारतासोबतचे राजनैतिक आणि सामरिक संबंधाकडे इराण गांभीर्याने पाहत आहे.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले की, भारताला सुखसमृद्धी,प्रगती, कल्याणासाठी शुभेच्छा. भारत आणि इराणमधील दीर्घकालीन संबंध समृद्ध व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान पाठवलेल्या संदेशामुळे संपूर्ण जगात चर्चा सुरू झाली आहे. भारत एकीकडे स्वातंत्र्याचे 80 वर्षे साजरे करत आहे. त्यामुळे त्याचे महत्व अधिकच वाढलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना विकासाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं. त्यांनी येत्या 2047 सालात भारताला विकसित करणार असल्याचे ध्येय निश्चित केले. याचदरम्यान इराणने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेने वेधून घेतले.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ