मुंबईकरांनो सावधान, राज्यात उष्णतेची लाट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात कमालीची वाढ होत असून मार्च अखेरीस राज्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यात तापमान वाढ कायम राहणार असून सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे […]

मुंबईकरांनो सावधान, राज्यात उष्णतेची लाट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात कमालीची वाढ होत असून मार्च अखेरीस राज्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यात तापमान वाढ कायम राहणार असून सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागतर्फे करण्यात आले  आहे.

महाराष्ट्रासह मुंबईत सध्या थंडी ते उन्हाळा असा ऋतूबदल होत असून वाऱ्याची दिशाही बदलली आहे. सध्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात मार्च अखेरीस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अशाचप्रकारचे चढे तापमान मुंबईकरांना अनुभवण्यास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात येत आहे.

दरम्यान, रविवारी मुंबईत हवामान विभागाने 36.7 अंश सेल्सिअसची नोंद केली असून सोमवारी मुंबईतील  कमाल तापमान 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सातांक्रुझ 36.7, कुलाबा 33.5, बोरिवली 40, ठाणे 41, डोंबिवली 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांनाही उन्हाळ्याची चाहूल लागली असून मुंबईकर सर्वत्र शीतपेय, आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.