AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील’

भक्त लोकांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला आहे की ते आपल्याविरोधात असणाऱ्या प्रत्येकाला टोकाचा विरोध करतील | Bhai Jagtap

'प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील'
| Updated on: Feb 04, 2021 | 5:36 PM
Share

मुंबई: आज साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले आणि त्यांनीही शेतकऱ्यांची (Farmers Protest) बाजू घेतली तर भक्तमंडळी त्यांनाही देशद्रोही, खलिस्तानी आणि काँग्रेसी म्हणायला कमी करणार नाहीत, असा खोचक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी लगावला. भक्त लोकांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला आहे की ते आपल्याविरोधात असणाऱ्या प्रत्येकाला टोकाचा विरोध करतील, असे भाई जगताप यांनी ट्विट करुन म्हटले.

‘फेरीवाल्यांकडून पैसे उकळणारा नेता काँग्रेसमध्ये असता तर मी थेट कारवाई केली असती’

शिवसेनेच्या नेत्यांकडून रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून परस्पर पैसे घेतले जात असल्याच्या मुद्द्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी कडाडून टीका केली. फेरीवाल्यांकडून पैसेवसुली करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याने अशाप्रकारचे कृत्य केले असते तर मी थेट कारवाई केली असती, असे भाई जगताप यांनी म्हटले.

ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस 227 जागांवर स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेने मांडलेल्या अर्थसंकल्पावर ताशेरेही ओढले. पालिकेचा अर्थसंकल्प हा फुगवलेला आहे. यंदाच्या वर्षी कर वाढतील, अशी भीती मुंबईकरांना होती. मात्र, सुदैवाने तसे घडले नाही. मात्र, महानगरपालिका प्रशासन 500 फुटांखालील घरांना सरसकट करमाफी का लागू करत नाही, असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या:

कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का!

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर

Follow Us
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.