AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टाने कपडे काढले, आता फक्त एक्सरे बाकी, जितेंद्र आव्हाड असे का म्हणालेत?

आमची जशी वज्रमूठ एक होती तशीच राहील. महाविकास आघाडी एकत्र आहेत. आम्हाला भीती नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

कोर्टाने कपडे काढले, आता फक्त एक्सरे बाकी, जितेंद्र आव्हाड असे का म्हणालेत?
| Updated on: May 12, 2023 | 3:33 PM
Share

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने काल सत्ता संघर्षावरील निकाल दिला. जो तो आपआपल्या पद्धतीने या निकालाचे विश्लेषण करत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सर्व कपडे काढून टाकलेत. आता फक्त एक्सरे करणे बाकी राहिले आहे. किती दिवसात पोपट मेल्याचे जाहीर करायचे, एवढं बाकी राहिले आहे. हा निकाल आमच्या बाजूने हे त्यांना सांगावे लागत आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

जास्तीत जास्त ते काय करतील?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने जे सांगितले ते देखील स्पष्ट आहे. पोलीस अधिकाऱ्यांना नोकरासारखे वागवतात. जास्तीत जास्त केसेस टाकतील. दुसरे ते काही करु शकत नाही. तुरुंगात टाकतील ते त्यापेक्षा जास्त काय करतील.

महाविकास आघाडी एकत्र आहे

सरकार काय करू शकते. फक्त खोट्या केसेस करू शकते. त्या व्यतिरिक्त सरकार काय करू शकते. चार दिवस सरकार जेलमध्ये टाकू शकते. त्याव्यतिरिक्त काय होऊ शकते, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. आमची जशी वज्रमूठ एक होती तशीच राहील. महाविकास आघाडी एकत्र आहेत. आम्हाला भीती नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेला लाथ मारली

राज्यातील जनतेला सांगायचे आहे की सत्ता कुणी सोडत नाही. सत्तेसारखा नाद कुठलाच नाही. सत्तेतून बाहेर पडणे याला नैतिक बळ लागते. आजही मला उद्धव ठाकरे यांचे कौतुक वाटते की त्यांनी सत्तेला लाथ मारली.

पानावर दिलेले वाचायचे असते

राज्यपालांना सुप्रीम कोर्टाने जे रुल बुक दिले आहे त्यानुसार काम करावं लागतं. पानावर लिहिलेलं वाचायचं असते आणि कारवाई करायची असते. त्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कपडे कोर्टाने फाडले. त्या नालायक माणसाला तिकडे बसवलं होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

याला नैतिकता म्हणायची काय?

कुठलेही सरकार निवडून आले तर दोन चार कोटी रुपये देऊन पाडून टाकायचे. याला नैतिकता म्हणायची काय, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. काल सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 200 च्या स्पीडने बॉलिंग करत होते. आज 10 च्या स्पीडने बोलले. ते थकलेलं वाटले, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.