AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, प्रत्येक दिंडीला मिळणार इतक्या हजारांचं अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आषाढीच्या वारीसाठी राज्यभरातून दिंड्या पुण्यात दाखल होतात, आपल्या विठुरायाचा जयघोष करत चालत पंढरीच्या दिशने जातात. गावांगावांमधून वारकरी दिंड्यांमध्ये येतात, दिंड्यांमध्येच सर्व प्रमुख नियोजन पाहत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रूपयांचं अनुदान देण्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना ही आर्थिक मदत […]

वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, प्रत्येक दिंडीला मिळणार इतक्या हजारांचं अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 14, 2024 | 11:41 PM
Share

आषाढीच्या वारीसाठी राज्यभरातून दिंड्या पुण्यात दाखल होतात, आपल्या विठुरायाचा जयघोष करत चालत पंढरीच्या दिशने जातात. गावांगावांमधून वारकरी दिंड्यांमध्ये येतात, दिंड्यांमध्येच सर्व प्रमुख नियोजन पाहत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रूपयांचं अनुदान देण्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना ही आर्थिक मदत खूप फायद्याची ठरणार आहे. आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पुर्व नियोजनासाठी सह्याद्री राज्य अथितीगृहामध्ये बैठक झाली. त्यामध्ये हा घोषणा करण्यात आली आहे.

दौंडमधील कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देश

या बैठकीमध्ये वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दौंडमधील कत्तलखान्याविषयी एक मागणी केली होती. दौंडमधील भीमा नदीच्या किनाऱ्यावर जो कत्तलखाना होणार होता तो कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. यंदाच्या वर्षीसुद्धा वारकऱ्यांना टोल माफ करण्यात आला आहे. बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाचं वारकरी प्रतिनिधींना टाळ वाजवत स्वागत केलं.

यंदाच्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करूयात, आषाढी वारी स्वच्छ. निर्मल आणि सुरक्षित व्हावी सरकारच्या सर्व विभागांनीही चांगली तयारी केली आहे. वारीवेळी जे अपघात होतात ते टाळण्यासाठी गृह विभागाला आदेश दिलेत. हे सरकार शेतकरी, वारकरी आणि सर्वसामन्यांचं आहे. आमच्या सरकारने खूप कमी वेळामध्ये शेतकरी महिला आणि तरूणांसाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आहेत. वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालायतून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे. आषाढ वारीतील वारकऱ्याचा दुर्देवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबीरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी