मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, लेफ्टो… आजारांचं घोंघावतं संकट, मुंबईकरांनो, स्वत:ला जपा!

| Updated on: Jul 27, 2022 | 7:00 AM

Malaria : मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, लेफ्टो, मुंबईवर संकटांची मालिका...

मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, लेफ्टो... आजारांचं घोंघावतं संकट, मुंबईकरांनो, स्वत:ला जपा!
प्रातिनिधिक फोटो...
Follow us on

मुंबई : मुंबईत कोरोनापूर्ण (Mumbai Corona) आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. अश्यात पावसाळी आजार बळावल्याने पुन्हा टेन्शन वाढलं आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत मलेरियाचे (Malaria) 154, डेंग्यूचे 17, लेप्टो 23, स्वाइन फ्लूचे (Swine Flu) 51 आणि गॅस्ट्रोचे तब्बल 184 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी रुग्णांची आकडेवारी काळजी घ्यावी, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.पावसामुळे पाणी साचून राहत डेंग्यू 524, दूषित पाण्यामुळे साथीचे आजार हिपेटायटीस 55 तर वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे चिकनगुनियाचा 1 रुग्ण आढळला आहे. मुंबईत जुलैपासून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे कीटकांचा प्रभाव वाढला. त्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्याचं सांगण्यात येतं. यामध्ये दूषित पाण्यामुळे ‘एच 1 एन 1’ 62 गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू (Dengue), चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं.

संकटांची मालिका

मुंबईत जुलैपासून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे कीटकांचा प्रभाव वाढला. त्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्याचं सांगण्यात येतं. यामध्ये दूषित पाण्यामुळे ‘एच 1 एन 1’ 62 गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं.आठवडाभरापूर्वी मुंबईत मलेरिया रुग्णांची संख्या 243, गॅस्ट्रो 340, डेंग्यू 33, लेप्टो 11 आणि स्वाइन फ्लू 11 इतकी होती. मात्र या आठवडाभरात रुग्णसंखेत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनापूर्ण आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. अश्यात पावसाळी आजार बळावल्याने पुन्हा टेन्शन वाढलं आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत मलेरियाचे 154, डेंग्यूचे 17, लेप्टो 23, स्वाइन फ्लूचे 51 आणि गॅस्ट्रोचे तब्बल 184 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी रुग्णांची आकडेवारी काळजी घ्यावी, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

काळजी घ्या!

वाढणारे पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पावसाळी आजार रोखण्यासाठी घरोघरी तपासणी आणि औषध गोळ्यांचे वाटपही करण्यात येत आहे. मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.