“माझी अटक बेकायदेशीर”, केतकी चितळेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

| Updated on: Jun 16, 2022 | 11:32 AM

केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांआधी तिला अटक झाली ही अटक झा बेकायदेशीर असल्याचा तिचा दावा आहे. तसा उल्लेख तिने या याचिकेत केला आहे

माझी अटक बेकायदेशीर, केतकी चितळेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Follow us on

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली. सध्या ती तळोजा जेलमध्ये आहे. पण आपली झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत तिने मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली आहे.

केतकीची उच्च न्यायालयात धाव

केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांआधी तिला अटक झाली ही अटक झा बेकायदेशीर असल्याचा तिचा दावा आहे. तसा उल्लेख तिने या याचिकेत केला आहे.

केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट

केतकी चितळे हिने 13 मेला एक कविता आपल्या फेसबुकवर शेअर केली होती. नितीन भावे लिखित ही कविता केतकीने शेअर करताच ती प्रकाश झोतात आली. ही कविता शरद पवार यांच्यावर टीका करणारी होती. ही फक्त टीका नव्हती तर आक्षेपार्ह भाषेत यात पवारांच्या शारिरिक व्यंगावर भाष्य करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

केतकीने शेअर केलेली आक्षेपार्ह कविता

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave

या कवितेनंतर केतकीवर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी केतकीच्या या पोस्टवर आक्षेप घेतला. तिच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. अन् तिला अखेर अटक झाली.