AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेचा गुजरातकडे मोर्चा, ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, मग अहमदाबादचं नाव कधी बदलणार?’

मनसेकडून डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. त्याचवेळी गुजरातमधील अहमदाबाद शहराच्या नावावरुन येथील भाजप सरकारला घेरले जात आहे. औरंगबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले मग अहमदाबादचे नाव केव्हा बदलणार? असा प्रश्न उपस्थित केलाय.

मनसेचा गुजरातकडे मोर्चा, 'औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, मग अहमदाबादचं नाव कधी बदलणार?'
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 29, 2023 | 6:48 PM
Share

सुनील जाधव, डोंबिवली : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. राज्यातील भाजप व शिवसेना सरकारने हे काम केले. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं बदललं. मग गुजरातमधल्या अहमदाबादचं  नाव अजूनही का आहे? यासंदर्भात गुजरातमधील नागरीक मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साद घालत आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

काय केली मागणी

गुजरातमधील लोक एका तलावावर मुस्लिमांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक भाजप सरकारऐवजी राज ठाकरे यांना साद घालत आहेत. कारण राज ठाकरे यांनी माहीम येथील समुद्रातील अतिक्रमणाचा विषय काढला आणि ते तोडण्यात आले. राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालत आहेत. यामुळे गुजरातमधूनही त्यांना साद घातली गेली आहे. तिथल्या लोकांच्या त्यांच्याकडे अपेक्षा आहेत, असे राजू पाटील यांनी सांगितले.

फेरीवाला अतिक्रमण

मनसेने फेरीवाला विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम मनसेने दिला होता. आज हे 15 दिवस होत असून आता मनसेकडून डोंबिवली स्टेशन (पूर्व) परिसर फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली…आता आमच्याकडे दुर्लक्ष करा ! असा आशयचा बॅनर लावण्यात आहे.

आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी करत प्रभाग अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले. कारवाईबाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरणानंतर आमदार राजू पाटील संतापले. हप्त्याची लाईन काढून दाखवू का ? कोण हप्ते गोळा करतात ते दाखवू का ? राजीनामा द्याल का ? लगेच बोलवतो. कोण किती घेतो नंतर कसं वाटप होतं, बोलवू का अशा शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

यामुळे आक्रमक

पालिका प्रशासनाला पत्र देऊन कारवाई होत नसल्याने पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिल्यानंतर आमदार रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचा फेरीवाल्यासोबत लागेबांध असल्याचा आरोप केला. हप्तेखोरी असल्याशिवाय अशा प्रकारची पद्धत राहणार नाही, असे त्यांनी म्हटलेय. सहा महिन्यात फक्त तीन फेरीवाल्यांवर कारवाई केली. मग या अधिकाऱ्यांची धिंड काढायची नाही का? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....