मनसेचा गुजरातकडे मोर्चा, ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, मग अहमदाबादचं नाव कधी बदलणार?’

मनसेकडून डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. त्याचवेळी गुजरातमधील अहमदाबाद शहराच्या नावावरुन येथील भाजप सरकारला घेरले जात आहे. औरंगबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले मग अहमदाबादचे नाव केव्हा बदलणार? असा प्रश्न उपस्थित केलाय.

मनसेचा गुजरातकडे मोर्चा, 'औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, मग अहमदाबादचं नाव कधी बदलणार?'
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 6:48 PM

सुनील जाधव, डोंबिवली : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. राज्यातील भाजप व शिवसेना सरकारने हे काम केले. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं बदललं. मग गुजरातमधल्या अहमदाबादचं  नाव अजूनही का आहे? यासंदर्भात गुजरातमधील नागरीक मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साद घालत आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

काय केली मागणी

गुजरातमधील लोक एका तलावावर मुस्लिमांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक भाजप सरकारऐवजी राज ठाकरे यांना साद घालत आहेत. कारण राज ठाकरे यांनी माहीम येथील समुद्रातील अतिक्रमणाचा विषय काढला आणि ते तोडण्यात आले. राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालत आहेत. यामुळे गुजरातमधूनही त्यांना साद घातली गेली आहे. तिथल्या लोकांच्या त्यांच्याकडे अपेक्षा आहेत, असे राजू पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

फेरीवाला अतिक्रमण

मनसेने फेरीवाला विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम मनसेने दिला होता. आज हे 15 दिवस होत असून आता मनसेकडून डोंबिवली स्टेशन (पूर्व) परिसर फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली…आता आमच्याकडे दुर्लक्ष करा ! असा आशयचा बॅनर लावण्यात आहे.

आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी करत प्रभाग अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले. कारवाईबाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरणानंतर आमदार राजू पाटील संतापले. हप्त्याची लाईन काढून दाखवू का ? कोण हप्ते गोळा करतात ते दाखवू का ? राजीनामा द्याल का ? लगेच बोलवतो. कोण किती घेतो नंतर कसं वाटप होतं, बोलवू का अशा शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

यामुळे आक्रमक

पालिका प्रशासनाला पत्र देऊन कारवाई होत नसल्याने पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिल्यानंतर आमदार रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचा फेरीवाल्यासोबत लागेबांध असल्याचा आरोप केला. हप्तेखोरी असल्याशिवाय अशा प्रकारची पद्धत राहणार नाही, असे त्यांनी म्हटलेय. सहा महिन्यात फक्त तीन फेरीवाल्यांवर कारवाई केली. मग या अधिकाऱ्यांची धिंड काढायची नाही का? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.