आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

बीएमसी निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करुन जागावाटप जुळवणं कठीण जाईल, असं शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचं मत असल्याची माहिती आहे

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 10:59 AM

मुंबई : राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्धार वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आला होता. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या साथीने लढवण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं. बीएमसी निवडणुकीत काँग्रेससोबत अधिकृत आघाडी करण्याचा शिवसेनेचाही इरादा नाही. मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या जागांवर शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना मुंबई महापालिकेतील 227 पैकी दोनशेहून अधिक जागा दशकानुदशकं स्वबळावर लढवत आली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडीत जुळवून घेणं कठीण जाईल, असं शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचं मत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

“म्हणून काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा”

“मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष नवीन आहेत. त्यामुळे ‘एकला चलो रे’ हा नारा देऊन ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावतील. मुंबईच्या काही पट्ट्यांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे तेही 80-100 जागांच्या खाली तडजोड करणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीत  आघाडीत सामावून घेणं सोपं जाणार नाही. आघाडी करुन आम्ही 150 च्या आसपास जागा लढवल्या, तर 114 हा बहुमताचा आकडा स्वबळावर गाठणं आम्हाला कठीण जाईल” असं संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1

(Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

शिवसेना काँग्रेससोबत ‘मैत्रीपूर्ण लढत’?

“शिवसेना-काँग्रेस 40-50 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करु शकतात. काँग्रेसला 50 जागा मिळाव्यात, याची खातरजमा आम्हाला करावी लागेल, तरच शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये मोठे अंतर असेल. बीएमसी निवडणुकीत बरेचदा विजयाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या आसपास असते. त्यामुळे आम्हाला 200 आणि काँग्रेसला 100 जागा जिंकणे गरजेचे आहे. काँग्रेसची मतपेटी असलेल्या गरीब आणि अल्पसंख्याक पट्ट्यात आम्ही सामंजस्याने उमेदवार देणार नाही” असे संकेतही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

“मुस्लिमबहुल मतदारसंघात शिवसेना ते काँग्रेस अशी थेट मतं ट्रान्सफर होणं शक्य नाही, त्यामुळे प्रभागनिहाय सूत्र ठरवावे लागेल. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत आघाडीचा विचार करु शकतो, कारण त्यांच्याकडून कमी जागांची मागणी होण्याची चिन्हं आहेत.” असंही शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं. 2022 मध्ये नियोजित मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी कंबर कसल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

(Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.