AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

बीएमसी निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करुन जागावाटप जुळवणं कठीण जाईल, असं शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचं मत असल्याची माहिती आहे

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?
| Updated on: Dec 22, 2020 | 10:59 AM
Share

मुंबई : राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्धार वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आला होता. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या साथीने लढवण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं. बीएमसी निवडणुकीत काँग्रेससोबत अधिकृत आघाडी करण्याचा शिवसेनेचाही इरादा नाही. मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या जागांवर शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना मुंबई महापालिकेतील 227 पैकी दोनशेहून अधिक जागा दशकानुदशकं स्वबळावर लढवत आली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडीत जुळवून घेणं कठीण जाईल, असं शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचं मत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

“म्हणून काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा”

“मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष नवीन आहेत. त्यामुळे ‘एकला चलो रे’ हा नारा देऊन ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावतील. मुंबईच्या काही पट्ट्यांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे तेही 80-100 जागांच्या खाली तडजोड करणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीत  आघाडीत सामावून घेणं सोपं जाणार नाही. आघाडी करुन आम्ही 150 च्या आसपास जागा लढवल्या, तर 114 हा बहुमताचा आकडा स्वबळावर गाठणं आम्हाला कठीण जाईल” असं संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1

(Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

शिवसेना काँग्रेससोबत ‘मैत्रीपूर्ण लढत’?

“शिवसेना-काँग्रेस 40-50 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करु शकतात. काँग्रेसला 50 जागा मिळाव्यात, याची खातरजमा आम्हाला करावी लागेल, तरच शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये मोठे अंतर असेल. बीएमसी निवडणुकीत बरेचदा विजयाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या आसपास असते. त्यामुळे आम्हाला 200 आणि काँग्रेसला 100 जागा जिंकणे गरजेचे आहे. काँग्रेसची मतपेटी असलेल्या गरीब आणि अल्पसंख्याक पट्ट्यात आम्ही सामंजस्याने उमेदवार देणार नाही” असे संकेतही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

“मुस्लिमबहुल मतदारसंघात शिवसेना ते काँग्रेस अशी थेट मतं ट्रान्सफर होणं शक्य नाही, त्यामुळे प्रभागनिहाय सूत्र ठरवावे लागेल. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत आघाडीचा विचार करु शकतो, कारण त्यांच्याकडून कमी जागांची मागणी होण्याची चिन्हं आहेत.” असंही शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं. 2022 मध्ये नियोजित मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी कंबर कसल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

(Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.