लग्नानंतर मी कधीही वड पूजला नाही… महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणतात, असाही एक वर्ग!

| Updated on: Jun 14, 2022 | 4:43 PM

रुपाली पाटील चाकणकरांनी ही भूमिका मांडल्यामुळे त्यांना अनेक टीकाकारांचे फोन येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावर त्या म्हणाल्या, 'टीकाकारांचेही मी आभार मानते. टीका करणा-यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळे अभ्यासपूर्ण विचारांच्या उंचीचे सातत्य राखता येते.'

लग्नानंतर मी कधीही वड पूजला नाही... महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणतात, असाही एक वर्ग!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः ‘मी वडाच्या झाडाला दोरे बांधून, फे-या मारत नाही किंवा मी वडाचा झाडाची फांदी तोडून कधीही वटपौर्णिमा (Vatpaurnima) साजरी करत नाही. लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही,’असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकलणकर (Rupali Chakankar) यांनी केलं आहे. खरं तर हे वक्तव्य त्यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केलं. पण त्यानंतर त्यांना अभिनंदनाचे तसेच तीव्र शब्दात टीका करणारे अनेक फोन आल्याची माहिती त्यांनी दिली. समाजात माझ्या भूमिकेचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी टीकाही केली. पण असा विचार करणाराही एक वर्ग आहे, असं चाकणकर यांनी सांगितलं. वटपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरात महिला वर्गाकडून वडाच्या झाडाची पूजा केली जातेय. तसेच महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून सात जन्म हाच पती मिळावा, अशी कामना समस्त महिलावर्गाकडून केली जाते. मात्र एकिकडे अशी भावना आणि भूमिका असलेल्या महिला असतानाच ज्योतिबा आणि सावित्रींच्या (Jyotiba Savitribai Fule) विचारांचा वारसा पुढे नेणाऱाही एक वर्ग आहे, असं वक्तव्य चाकणकर यांनी केलंय.

वटपौर्णिमेविषयी चाकणकरांची भूमिका काय?

वटपौर्णिविषयी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरद्वारे त्यांची भूमिका व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाची पूजा केली नाही. मात्र अशी पूजा करणाऱ्यांच्या भावना आणि भूमिका मी समजू शकते. याच वेळी वडाची पूजा न करणाराही एक वर्ग आहे. तसंच ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा  विचार पुढे नेणारा आणि विज्ञानवादी विचार करणाराही एक वर्ग आहे. मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षांचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते. काय योग्य काय अयोग्य याचा विचार ज्याचा त्याने करावा आणि तशी कृती करावी, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘टीकाकारांमुळे विचारांत सातत्या राखता येतं’

रुपाली पाटील चाकणकरांनी ही भूमिका मांडल्यामुळे त्यांना अनेक टीकाकारांचे फोन येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावर त्या म्हणाल्या, ‘टीकाकारांचेही मी आभार मानते. टीका करणा-यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळे अभ्यासपूर्ण विचारांच्या उंचीचे सातत्य राखता येते.’

‘वृक्षसंवर्धन करणं हीच आमची वटपौर्णिमा’

वृक्षसंवर्धन हीच वटपौर्णिमा, अशी भूमिका मांडताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘
यंदाच्या वर्षी आम्ही सहकुटुंब वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. माझ्या पतीने वडाचे रोप लावून पूजा केली आणि सात फे-या पूर्ण करुन जन्मोजन्मी ही वैचारिक साथ कायम रहावी म्हणून प्रार्थना केली. ऑक्सिजनचा स्रोत असणा-या वडाचे रोपटे लावणे, रोपवाटप आणि वृक्षसंवर्धन हीच आमची ‘वटपौर्णिमा’.