दिवावासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना!

| Updated on: Jun 14, 2022 | 2:45 PM

एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. दिवामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणी वाढवून मिळावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोर धरू लागली होती. त्यामुळेच आता साडेसहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिवावासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना!
मुंबईत सोमवारपासून पाणी कपात
Follow us on

मुंबई : दिवाकरांसाठी (Diva) एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. दिवाकरांची आता पाणीटंचाईपासून कायमची सुटका होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यामुळे दिवावासीयांची आता पाणीटंचाईपासून कायमची सुटका होणार आहे. दिवाकरांना जादा सहा एमएलडी पाणी मिळणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालच जलसंपदा विभागालाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात सुचना दिल्यात. मान्सूम अजून राज्यामध्ये दाखल झाला नाहीये. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या (Rain) सरी बरसल्या आहेत. आता पावसाळा तोंडावर असताना दिवावायिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक

एकनाथ शिंदे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. दिवामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणी वाढवून मिळावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोर धरू लागली होती. त्यामुळेच आता साडेसहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिवामधील पाणीटंचाईचा विषय गंभीर होता. लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नव्हते. मात्र, नवीन निर्णयामुळे दिवा येथील लोकांना मोठा दिलास मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

दिवाकरांचे पाण्याचे टेन्शन मिटणार

दिवाच्या पाणी प्रश्नी घेण्यात आलेल्या बैठकीला खासदार शिंदे, नरेश म्हस्के, आयुक्त श्रीकांत शिंदे, डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र नार्वेकर, दिवा सुदाम परदेशी, ठाणे, कल्याण डोबिवली महापालिकांचे नगरसेवक, महाराष्ट्र औद्योगिक विकास, महामेदव व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे याच बैठकीमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या पाणीटंचाई संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीच्या पाणीटंचाईबद्दल एकनाथ शिंदे लवकर पाहणी करून निर्णय घेतील, असेही सांगण्यात येते आहे.